पंतप्रधान कार्यालय
विश्वास, विकास आणि जनकल्याणाप्रती समर्पित सरकारच्या 12 वर्षांच्या वाटचालीवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2026 10:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की सरकारचा गेल्या 12 वर्षांचा कार्यकाळ विश्वास, विकास आणि जनकल्याणाप्रती समर्पित राहिला आहे. 140 कोटी भारतीयांचे आशीर्वाद आणि ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना यांच्या मदतीने तरुण वर्ग, महिला तसेच शेतकरी बंधू-भगिनींना सक्षम करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली गेली नाही असे त्यांनी नमूद केले.
पायाभूत सुविधांपासून डिजिटल क्रांतीपर्यंत प्रत्येक बाबतीत आज देशाने जगभरात नवी ओळख निर्माण केली आहे हे अथक प्रयत्नांचेच फळ आहे असे निरीक्षण मोदी यांनी नोंदवले. विकसित भारत उभारण्याचा निर्धार पूर्ण करण्यासाठी सरकार सेवा, उत्तम प्रशासन आणि समृद्धीच्या याच मार्गावरून पुढे जात राहिल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
‘एक्स’वर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“आपल्या सरकारच्या कार्यकाळाची गेली 12 वर्षे विश्वास, विकास तसेच जनकल्याणाप्रती समर्पित राहिली आहेत. 140 कोटी देशवासीयांचे आशीर्वाद आणि ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेसह आम्ही युवा वर्ग, महिला तसेच शेतकरी बंधू-भगिनींना सक्षम करण्यात कोणतीही कसूर केली नाही. पायाभूत सुविधांपासून डिजिटल क्रांतीपर्यंत प्रत्येक बाबतीत आज देशाला जगभरात नवी ओळख मिळाली आहे हे आमच्या अथक प्रयत्नांचेच फळ आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचा निर्धार पूर्ण करण्यासाठी आम्ही सेवा, उत्तम प्रशासन आणि समृद्धीच्या याच मार्गावरून सतत पुढे जात राहू.
#12YearsOfSeva"
***
NitinFulluke / SanjanaChitnis / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2270625)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam