पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सुभाषिताच्या माध्यमातून समाजकल्याणासाठी कल्याणकारी विचारांच्या शक्तीवर दिला भर

Posted On: 31 DEC 2025 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 डिसेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या कल्याणासाठी कल्याणकारी विचारांच्या महत्त्वावर भर दिला आहे. मोदी यांनी अधोरेखित केले की, उदात्त हेतू आणि सकारात्मक संकल्पाची जोपासना केल्यास सर्व प्रयत्न यशस्वी होतात; वैयक्तिक सदाचार सामूहिक प्रगतीसाठी हातभार लावतो, हा शाश्वत संदेश त्यांनी पुन्हा दृढ केला.

प्राचीन ज्ञानाचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी X वरील एका पोस्टमध्ये नमूद केले:

“कल्याणकारी विचारांनीच आपण समाजाचे हित करू शकतो.

यथा यथा हि पुरुषः कल्याणे कुरुते मनः। तथा तथाऽस्य सर्वार्थाः सिद्ध्यन्ते नात्र संशयः।।”

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2210102) अभ्यागत कक्ष : 40