पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली श्रद्धांजली

प्रविष्टि तिथि: 11 DEC 2025 10:20AM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. 

महाकवी भारती यांच्या कवितांमुळे धैर्य निर्माण केले; त्यांच्या विचारांमध्ये असंख्य लोकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवण्याची आणि भारताच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतनेला प्रकाश देण्याची शक्ती होती, असे मोदींनी म्हटले आहे. त्यांनी न्याय्य आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी काम केले. तमिळ साहित्य समृद्ध करण्यातील त्यांचे योगदान देखील अतुलनीय आहे, असेही पुढे पंतप्रधानांनी म्हटले आहे 

आपल्या  एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“महाकवी सुब्रमण्यम भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. त्यांच्या  कवितांनी धैर्य निर्माण केले; आणि त्यांच्या विचारांमध्ये असंख्य लोकांच्या मनावर अमीट ठसा उमटवण्याची शक्ती होती. त्यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणीवेला उजळवून टाकले. त्यांनी न्याय्य आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी काम केले. तमिळ साहित्य समृद्ध करण्यातील त्यांचे योगदान देखील अतुलनीय आहे.”

***

NehaKulkarni/SampadaPatgaonkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2202123) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam