'गोंधळ' साठी संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रजत मयूर पुरस्कार
परंपरा, स्वरूप आणि कथनाच्या अचूकतेवर प्रभुत्व मिळवल्याबद्दल ज्युरींनी केले चित्रपटाचे कौतुक
शेक्सपियरच्या काळातील दंतकथा वास्तविक जगात आणणारी एक सिनेमॅटिक कलाकृती
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संतोष डावखर यांना त्यांच्या 'मराठी गोंधळ' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा 'सिल्व्हर पीकॉक' अर्थात रजत मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात रजत मयूर चषक, गुणवत्ता प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपयांचे रोख पारितोषिक यांचा समावेश आहे. कथेला अनुभवात आणि सांस्कृतिक स्मृतीला गतिमान प्रतिमेत रूपांतरित करणाऱ्या दिग्दर्शनातील उत्कृष्टतेसाठी हा गौरव करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि माहिती व प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, इफ्फी ज्युरीचे अध्यक्ष राकेश ओमप्रकाश मेहरा आणि महोत्सव संचालक शेखर कपूर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला.

ज्युरी म्हणाले, "सांस्कृतिक परंपरेच्या समृद्ध रचनेच्या विरुद्ध जाऊन दिग्दर्शकाने एका सिनेमॅटिक रत्नाला जन्म दिला आहे. ही एक मनमोहक कथा असून ती आपल्याला एका धारदार बिंदूवर पकडून ठेवते, आपल्याला कल्पनेपलीकडे आश्चर्यचकित करते. गोंधळ हा चित्रपट वास्तविक जगातल्या शेक्सपियरच्या दंतकथेसारखा आहे.”
हा पुरस्कार गोंधळला 56 व्या इफ्फीच्या परिभाषित कलात्मक कृतींपैकी एक म्हणून स्थान देते, संतोष डावखर यांना एक चित्रपट निर्माता म्हणून चिन्हांकित करते, जे परंपरा आणि कल्पना दोन्हीचा खुबीने वापर करतात, असा हा स्मृतीतून जन्मलेला, कलाकुसरीने धारदार आणि कल्पनाशक्तीने पुढे नेणारा सिनेमा ठरतो.
गोंधळचा सारांश

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घडणाऱ्या मध्यरात्रीच्या धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट श्रीमंत आनंदबरोबर लग्नात अडकलेल्या सुमनच्या जीवनावर प्रकाश टाकतो. एक करिष्माई गोंधळी कलाकार असणाऱ्या साहेब याच्यावरचे तिचे प्रेम निषिद्ध ठरले होते, त्यामुळे ती एक कारस्थान रचते. विधी वेगाने पुढे जात असताना ती आनंदच्या वेडसर चुलत भावाला, सर्जेरावला, जे कृत्य ती स्वतः करू शकत नाही ते करण्यास धूर्तपणे फसवते. ढोल वाजवण्याचे आवाज होताना आणि पूर्वजांच्या आवाहनांमध्ये, सुमन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करते, तिचे भाग्य साहेबच्या नशिबात गुंतलेले असते. या उत्साही रात्री भक्ती फसवणुकीमध्ये विलीन होते आणि मोक्ष आणि बंधन अस्पष्ट होतात ज्यामुळे संपूर्ण शहरात आग, रक्त आणि भीतीचे वातावरण पसरते.
गोंधळच्या पत्रकार परिषदेची लिंक
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2196543
| Visitor Counter:
4