राष्ट्रपती कार्यालय
भारताच्या राष्ट्रपतींनी तिरुवनंतपुरम येथील राजभवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती श्री के.आर. नारायणन यांच्या प्रतिमेचे केले अनावरण
के आर नारायणन यांचे जीवन धैर्य, चिकाटी आणि आत्म-श्रद्धेची गाथा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
23 OCT 2025 5:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2025
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (23 ऑक्टोबर 2025) तिरुअनंतपुरम येथील राजभवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती श्री के आर नारायणन यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, के आर नारायणन यांचे जीवन धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाची गाथा आहे. अपार समर्पण आणि शिक्षणाच्या सामर्थ्याने त्यांनी आपल्या देशाचे सर्वोच्च संवैधानिक पद भूषवले. त्यांची शैक्षणिक उत्कृष्टता हे ध्येयाने मार्गदर्शन केल्यास दृढनिश्चय आणि संधी काय साध्य करू शकते याचे प्रतीक होते. राजकारणात येण्यापूर्वी नारायणन यांची भारतीय परराष्ट्र सेवेत एक प्रतिष्ठित कारकीर्द होती, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी भारताच्या शांतता, न्याय आणि सहकार्याच्या मूल्यांचे अत्यंत प्रामाणिकपणे पालन केले. नारायणन नेहमीच निष्पक्षता आणि समावेशकतेच्या तत्त्वांवर ठाम राहिले, असेही त्या म्हणाल्या. नारायणन यांचे त्यांचे गृहराज्य केरळशी असलेले नाते खोलवर रुजलेले होते, असे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले.
सामाजिक प्रगती आणि शिक्षण आणि समावेशकतेवर भर देण्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली. सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही ते त्यांच्या मुळांशी जोडलेले राहिले. त्यांनी सांगितले की, नारायणन यांनी आयुष्यभर मानवी आणि राष्ट्रीय विकासात शिक्षणाच्या भूमिकेवर भर दिला.
त्यांच्यासाठी शिक्षण हे काही मोजक्या लोकांसाठी विशेषाधिकार नव्हते, तर सर्वांसाठी हक्काचे होते. मानवी मूल्ये संस्कृतीच्या विकासासाठी आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहेत असा विश्वास नारायणन यांचा होता. राष्ट्रपती म्हणाले की के आर नारायणन यांनी नैतिकता, सचोटी, करुणा आणि लोकशाही भावनेचा समृद्ध वारसा मागे सोडला आहे.

आज आपण त्यांचे स्मरण करत असताना, आपण त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांचे जीवन राष्ट्र उभारणीसाठी समर्पित होते, अधिक समावेशक, न्याय्य आणि दयाळू भारत निर्माण करण्यासाठी, ते झटले. त्यांच्या स्मृती लोकांना समानता, अखंडता आणि सार्वजनिक सेवेच्या मूल्यांचे पालन करण्यास प्रेरित करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2181902)
Visitor Counter : 4