कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय कंपनी व्यवहार संस्थेकडून नागपूर येथील एनएडीपीमध्ये म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय सामाजिक दायित्व क्षमता बांधणी कार्यक्रम


भारतीय कंपनी व्यवहार संस्था आणि राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी यांच्यात झाला सामंजस्य करार

Posted On: 23 JUN 2025 8:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जून 2025

 

भारतीय कंपनी व्यवहार संस्थेने (आयआयसीए) नागपूर इथल्या राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी (एनएडीपी) येथे म्युनिशन्स इंडिया लिमिटेड च्या अधिकाऱ्यांसाठी सामाजिक दायित्वावर तीन दिवसांचा क्षमता बांधणी कार्यक्रम सुरु  केला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण भारतीय कंपनी व्यवहार संस्था आणि राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी यांच्यातील सामंजस्य  करारावरील स्वाक्षरी ठरले . आयआयसीएचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर कुमार सिंह यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली  आणि प्रेरणेमुळे या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.  

9 जूनला कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रापूर्वी आयआयसीएच्या स्कूल ऑफ बिझनेस एन्व्हायर्नमेंटच्या सह. प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. गरिमा दधीच आणि एनएडीपीचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. जे. पी. दास यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये क्षमता-निर्मिती प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी आणि सीइसार  पद्धतींमध्ये उत्कृष्टता वाढवण्यासाठी सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. गरिमा दधीच यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उद्घाटन सत्राने झाली. त्यांनी कंपनी कायद्याअंतर्गत सीएसआरची महत्त्वाची भूमिका ही एक धोरणात्मक व्यवसायविषयक आवश्यकता आणि कायदेशीर अनुपालनासाठी गरजेची बाब म्हणून अधोरेखित केली. त्यांनी  सहभागींना राष्ट्रीय विकास उद्दिष्टांशी सीएसआरची सांगड  घालण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन बाळगण्यासाठी  प्रोत्साहित केले.  एनएडीपीचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. जे. पी. दास यांनी सीएसआर क्षेत्रातील सहभागींचे ज्ञान, नेतृत्व क्षमता आणि अंमलबजावणी क्षमता वाढविण्यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाची समर्पकता अधोरेखित केली. सामाजिकदृष्ट्या जबाबदार सार्वजनिक क्षेत्रातील नेतृत्व निर्माण करण्यासाठी एक पाऊल म्हणून त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

3 दिवसांच्या या कार्यक्रमात सीएसआर धोरण तयार करणे, परिणाम मूल्यांकन, शाश्वतता अहवाल आणि पर्यावरणीय शाश्वतता, उपजीविका निर्मिती आणि सामाजिक समावेश यासारख्या राष्ट्रीय प्राधान्यांशी मेळ यांचा  समावेश होता. आयआयसीए आणि बाह्य संस्थांमधील तज्ञ व्याख्याने, केस स्टडी आणि परस्परसंवादी कार्यक्रमांच्या  माध्यमांतून सहभागींना माहिती देण्यात आली.

भारतातील जबाबदार कॉर्पोरेट वर्तन आणि शाश्वत विकासासाठी भागधारकांमध्ये क्षमता निर्माण करण्याच्या आयआयसीएच्या ध्येयातील हा उपक्रम आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

 

* * *

N.Chitale/H.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2139030)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil