दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
एआय-नेटिव्ह टेलिकॉम नेटवर्क प्रगतीसाठी भारताच्या यजमानपदाखाली आयटीयू एफजी-एआयएनएन बैठकीचे आयोजन
भारताचा आयटीयू पीपी-30 च्या यजमानपदासाठी प्रस्ताव,आयटीयू रेडिओकम्युनिकेशन ब्युरोच्या संचालक पदासाठी एम. रेवती यांचे नामांकन
Posted On:
11 JUN 2025 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2025
दूरसंचार नेटवर्कमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) नेटिव्ह चे एकत्रीकरण करण्याच्या शक्यता पडताळण्यासाठी सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या (आयटीयू-टी) फोकस ग्रुप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजेंस नेटिव्ह फॉर टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्स (एफजी-एआयएनएन) ची तिसरी बैठक आज नवी दिल्ली येथे सुरू झाली. दूरसंचार विभागाची तांत्रिक शाखा असलेल्या दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राने (टीईसी) या आयटीयू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात बोलताना, डीसीसीचे सदस्य (टी) संजीव बिडवई यांनी एआय-नेटिव्ह नेटवर्क्स (एआय-एनएन) हे दूरसंचार डिझाइनमध्ये मूलभूत बदल घडवून आणत असल्याचे नमूद केले. थर्ड जनरेशन पार्टनरशिप प्रोजेक्ट (3GPP) मानकांमध्ये एआयच्या वाढत्या भूमिकेची त्यांनी नोंद घेतली, ज्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये त्याचा हुशारीने मेळ घालणे शक्य झाला आहे. बिडवई यांनी या क्षेत्रातील भारताच्या सध्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला, ज्यामध्ये 'भारत जेन' हे भारतीय भाषांसाठीचे भारतातील पहिले देशांतर्गत विकसित, सरकारचे वित्तीय पाठबल लाभलेले, एआय-आधारित मल्टिमोडल लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम), तसेच एआय-आधारित नेटवर्क ऑटोमेशन आणि डिजिटल ट्विन्समध्ये आयआयटी आणि सीडीओटीच्या नेतृत्वाखालील इतर प्रकल्प, यासारख्या राष्ट्रीय उपक्रमांचा समावेश आहे. त्यांनी नैतिक, समावेशक आणि सुरक्षित पद्धतीने एआय वापर करण्याच्या महत्त्वावर भर दिला, तसेच स्पष्टीकरणक्षमता, डिजिटल सार्वभौमत्व आणि नियामक चौकटींच्या उत्क्रांतीची गरज अधोरेखित केली.

आयटीयूच्या आशिया-पॅसिफिक विभागाच्या प्रादेशिक संचालक अत्सुओ ओकुडा यांनी डिजिटल नवोन्मेश केंद्र म्हणून या प्रदेशाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आणि स्मार्ट, सुरक्षित आणि प्रतिसादात्मक संवाद प्रणाली उभारण्यासाठी एआय-नेटिव्ह नेटवर्क कसे आवश्यक आहे, यावर भर दिला. त्यांनी डिजिटल तफावत भरून काढण्यासाठी आणि स्मार्ट सिटीज आरोग्य सेवा आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये नव्याने करण्यात येणाऱ्या उपयोगासाठी बळ देण्याकरिता सहयोगी चौकटींची गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमादरम्यान, भारताने आयटीयू पुर्णाधिकारी परिषद 2030 (पीपी -30) च्या आयोजनासाठी, आगामी आयटीयू कौन्सिलमधील कायम सदस्यत्व (2027-2031), आणि आयटीयू रेडिओकम्युनिकेशन ब्युरोच्या संचालक पदासाठी (2027-30) पहिली महिला आणि आयटीयू रेडिओकम्युनिकेशन ब्युरोच्या संचालक पदासाठी पहिली महिला आणि पहिली प्रादेशिक उमेदवार म्हणून भारताच्या एम. रेवती यांच्यासाठी आयटीयू सदस्यांचा पाठिंबा मागितला.

हा कार्यक्रम, जागतिक दूरसंवाद परिप्रेक्ष्यात क्रांती घडवण्याची क्षमता असलेल्या एआय-नेटिव्ह टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्सच्या भविष्याला आकार देण्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. एआय जसा विकसित होईल, तसे फोकस ग्रुपने केलेले काम अधिक बुद्धिमान, अनुकूल आणि कार्यक्षम नेटवर्कसाठी पाया घालण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
फोकस ग्रुप एआय-नेटिव्ह नेटवर्क विषयी
जुलै 2024 मध्ये आयटीयू-टी स्टडी ग्रुप 13 द्वारे स्थापित, फोकस ग्रुप ऑन एआय-नेटिव्ह फॉर टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्स (एफजी-एआयएनएन) चे उद्दिष्ट, एआयच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी नेटवर्क आर्किटेक्चरमध्ये आवश्यक असलेल्या मूलभूत बदलांचा शोध घेणे आणि ते परिभाषित करणे, हे आहे.
स्मार्ट सार्वजनिक सेवा, एकमेकांशी जोडलेली वाहतूक व्यवस्था आणि आपत्ती-जागरूक दूरसंवाद प्रणाली यासारख्या पुढील पिढीतील एप्लिकेशन्स चा शोध घेऊन, हा फोकस ग्रुप (गट) अशा नेटवर्क्सचा पाया रचत आहे जे केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रगत नसेल, तर सार्वजनिक गरजांना तत्परतेने प्रतिसाद देईल.
अधिक माहितीसाठी डीओटी हॅन्डल फॉलो करा:-
X - https://x.com/DoT_India
Insta https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==
Fb - https://www.facebook.com/DoTIndia
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135821)