कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  शिवराज सिंह चौहान सोमवारी हैदराबादला भेट देणार

Posted On: 08 JUN 2025 6:29PM by PIB Mumbai

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) "विकसित कृषी संकल्प अभियान " हे देशव्यापी जनजागृती अभियान सुरू केले आहे. 29 मे ते 12 जून 2025 या काळात खरीपपूर्व हंगामात हे अभियान राबवले जात आहे. या प्रमुख मोहिमेचा उद्देश वैज्ञानिक प्रगती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी संशोधन आणि तळागाळातील कृषी पद्धती  यांच्यातली दरी दूर करून   "विकसित भारत @2047" या संकल्पनेच्या पूर्ततेस हातभार लावणे हा आहे.

आयसीएआरच्या मार्गदर्शनाखाली, हैदराबाद येथील आयसीएआर-एटीएआरआय, विभाग एक्स यांना आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विकसित कृषि संकल्प अभियानचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ही मोहीम कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), आयसीएआर संस्थांची प्रादेशिक संशोधन केंद्रे, तसेच राज्य कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त सहभागातून राबवली जात आहे. संबंधित राज्यांतील कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागांशी घनिष्ठ समन्वय साधून ही मोहीम पुढे नेली जात आहे.

या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून, केंद्रीय  कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  शिवराज सिंह चौहान हे उद्या दिनांक 9 जून 2025 रोजी तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील विकसित कृषि संकल्प अभियानाच्या कार्यक्रम स्थळांना भेट देतील. या भेटीचा उद्देश शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून, मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धोरणात्मक मार्गदर्शन करणे हा आहे.

या कार्यक्रमात तेलंगणामधील सुमारे 1500 शेतकरी व महिला शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. वैज्ञानिक-शेतकरी संवाद सत्राद्वारे टिकाऊ पद्धती, सुधारित तंत्रज्ञान आणि कृषी व जलशेतीसाठी समन्वित दृष्टिकोन यांची माहिती मिळवण्याची संधी सहभागींना मिळणार आहे.

***

S.Kane/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2135033)
Read this release in: English , Hindi , Tamil