संरक्षण मंत्रालय
जागतिक पर्यावरण दिन 2025 निमित्त भारतीय तटरक्षक दल करणार सागरी संवर्धन प्रयत्नांचे नेतृत्व
Posted On:
04 JUN 2025 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2025
जागतिक पर्यावरण दिन 2025 निमित्त, भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) सागरी संवर्धन आणि शाश्वत सागरी प्रशासनात आपली प्रमुख भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. गेल्या वर्षी 58 हून अधिक प्रमुख सागरी किना-यांवर स्वच्छता मोहिमा राबवून 194 टनांहून अधिक प्लास्टिक कचरा काढून टाकला होता. 'आयसीजी'ने 'स्वच्छ सागर-सुरक्षित सागर, पुनीत सागर अभियान' आणि मिशन लाईफ सारख्या प्रमुख मोहिमांतर्गत या वर्षीच्या जागतिक संकल्पनेनुसार #BeatPlasticPollution मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
भारताला लाभलेल्या 11,000 किलोमीटरच्या विस्तृत किनारपट्टीवर कार्यरत, आयसीजी किना-यावरील जैवविविधता आणि उपजीविकेला आधार देणाऱ्या प्रवाळ खडक, खारफुटी आणि प्राणी, पक्ष्यांचा अधिवास असलेल्या समुद्रकिनाऱ्यांसह महत्त्वाच्या परिसंस्थांचे रक्षण करते.ही सेवा सागरी पर्यावरणीय धोक्यांविरुद्ध देशाच्या आघाडीच्या संरक्षण म्हणून देखील काम करते. समुद्र प्रहरी, समुद्र पहरेदार आणि समुद्र पावक यासारख्या प्रदूषण नियंत्रण जहाजांसह, आयसीजी तेल गळती आणि रासायनिक प्रदूषणाविरुद्ध जलद प्रतिसाद प्रयत्नांचे नेतृत्व करते. यासाठी 50 हून अधिक राष्ट्रीय भागधारकांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रमाणात NATPOLREX सरावांद्वारे बळकटी दिली जाते.
प्रदूषण नियंत्रणाव्यतिरिक्त, आयसीजी वन्यजीव संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2025 मध्ये, ऑपरेशन ऑलिव्हियाने ओडिशाच्या किनाऱ्यावर घरटे बांधणाऱ्या 6.98 लाखांहून अधिक ऑलिव्ह रिडले कासवांचे संरक्षण केले. अंदमान आणि निकोबार बेटांवर शिकारविरोधी प्रयत्नांमुळे समुद्री काकडी आणि प्रवाळासह धोक्यात असलेल्या सागरी प्रजातींच्या बेकायदेशीर व्यापाराला आणखी आळा बसला आहे.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133975)