जलशक्ती मंत्रालय
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिल्ली येथे भारतातील सर्वात मोठे स्वच्छता सर्वेक्षण - स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (एसएसजी) 2025 चा केला प्रारंभ
Posted On:
29 MAY 2025 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2025
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाद्वारे आयोजित देशव्यापी ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (एसएसजी) 2025 चा प्रारंभ केला.

या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी "मापन ते व्यवस्थापन" या तत्वाचे महत्व पुन्हा एकदा सांगितले. हे तत्व कार्यक्रमांच्या प्रमुख परिणामांना आधार देणारे आहे, असे ते म्हणाले. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपले नवोन्मेष आणि सर्वोत्तम पद्धती नियमित सामायिक करत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता हे काही काळापुरते ध्येय नाही तर एक निरंतर प्रवास आहे. आपण विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करत असताना, स्वच्छता ही खऱ्या लोकसहभागातून समर्थित एक शाश्वत, लोक-नेतृत्वाखालील प्रयत्न बनली पाहिजे, असे ते म्हणाले.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (एसएसजी) 2025 चा उद्देश ग्रामीण स्वच्छतेच्या स्थितीचे काटेकोरपणे मूल्यांकन करणे हे आहे. यात स्वच्छ भारत मिशन - ग्रामीण अंतर्गत साध्य झालेल्या हागणदारीमुक्त (ओडीएफ) प्लस मॉडेलचे परिणाम टिकवून ठेवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन-2 अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक स्वच्छता मापदंडांवर आधारित भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच जिल्ह्यांची राष्ट्रीय क्रमवारी करणे हे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (एसएसजी) 2025 प्रमुख उद्दिष्ट आहे.
S.Kakade/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2132551)