संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्कर कमांडर्स परिषदेदरम्यान संरक्षण मंत्र्यांनी भारतीय सैन्याच्या वरिष्ठ नेतृत्वाला केले संबोधित

Posted On: 03 APR 2025 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2025

 

लष्कर कमांडर्स  परिषद हा एक सर्वोच्च पातळीवरील द्वैवार्षिक कार्यक्रम आहे, जो 1 एप्रिल ते 4 एप्रिल 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केला जात आहे. परिषदेच्या तिसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याच्या वरिष्ठ नेतृत्वाला संबोधित केले. त्याआधी "सुधारणांचे वर्ष" या विषयावर थोडक्यात माहिती देण्यात आली.

देशातील सर्वात विश्वासू आणि प्रेरणादायी संघटनांपैकी एक म्हणून भारतीय सैन्यावर अब्जावधी नागरिकांचा विश्वास असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी तसेच प्रत्येक गरजेच्या वेळी नागरी प्रशासनाला मदत करताना लष्कराने बजावलेल्या प्रशंसनीय भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. संरक्षणमंत्र्यांनी सध्याची भौगोलिक धोरणात्मक अनिश्चितता आणि जागतिक स्तरावर प्रत्येकावर परिणाम करणाऱ्या गुंतागुंतीच्या जागतिक परिस्थितीवर भर दिला. उत्तरेकडील सीमेवरील सध्याच्या परिस्थितीबद्दल  संरक्षणमंत्र्यांनी सैन्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि  खंबीर आणि जागरूक राहिल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले आणि यापुढेही  दक्ष राहण्याचे आवाहन  केले.

   

संरक्षणमंत्र्यांनी बीआरओच्या प्रयत्नांचे कौतुक केले, कठीण परिस्थितीत काम करत असूनही त्यांच्यामुळे पश्चिम आणि उत्तर सीमेवरील रस्ते वाहतुकीत‌ मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. पश्चिम सीमेवरील परिस्थितीचा संदर्भ देत, त्यांनी शत्रूकडून प्रॉक्सी युद्ध सुरू असले तरी सीमापार दहशतवादाला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक केले.

संरक्षणमंत्र्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या तंत्रज्ञान  प्रगतीवर भर दिला आणि त्यांचा योग्यरीत्या समावेश केल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले. त्यांनी प्रमुख शैक्षणिक संस्थांसह नागरी उद्योगांच्या सहकार्याने विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आणि 'स्वदेशीकरणाद्वारे आधुनिकीकरण' किंवा 'आत्मनिर्भरता' या उद्दिष्टांकडे प्रगती करण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले की "संरक्षण कूटनीति, स्वदेशीकरण, माहिती युद्ध, संरक्षण पायाभूत सुविधा आणि सैन्य आधुनिकीकरणाशी संबंधित मुद्द्यांवर अशा व्यासपीठावर नेहमीच चर्चा झाली पाहिजे. सशस्त्र दलांना भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा सैद्धांतिक बदल केले पाहिजेत.”

 

* * *

S.Kane/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2118212) Visitor Counter : 20