कृषी मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी शेती आणि ग्रामीण विकासाकरिता मांडलेला दृष्टीकोन साकार करण्याचा केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा संकल्प
Posted On:
16 AUG 2024 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास या दोन्ही मंत्रालयातील सफाई कर्मचारी, एमटीएस ते सचिव स्तरावरील कर्मचारी आणि अधिकारी यांची बैठक घेतली. कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान आणि डॉ.चंद्रशेखर पेम्मासानी हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

शिवराजसिंह चौहान यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच आयसीएआरच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी संवाद साधला.स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी मांडलेला दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प चौहान यांनी यावेळी केला. 2047 चा आराखडा आणि विकसित भारतासाठीचे संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले आहेत की, तिप्पट काम करण्याची गरज आहे; त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिप्पट परिश्रम करू,अशी ग्वाही चौहान यांनी दिली.

शिवराज सिंह म्हणाले की आम्ही सर्व एक कुटुंब आहोत, आम्ही एकत्र काम करू.यावेळी त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याची शपथ घेतली. चौहान यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना देखील शपथ घ्यायला लावली. कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून विकसित भारताच्या निर्मितीसाठी आम्ही पूर्ण परिश्रमाने, प्रामाणिकपणे, समर्पणाच्या वृत्तीने आणि सर्व क्षमता पणाला लावून काम करू, असा संकल्प त्यांनी केला. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये ग्रामीण विकास विभागाने अतुलनीय भूमिका बजावली पाहिजे. आम्ही आमचे काम पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे करू,असे त्यांनी सांगितले.

N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2046108)