पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी आझमगढमध्ये केले 34,000 कोटींहून अधिक खर्चांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी


पंतप्रधानांनी केले देशभरातील 15 विमानतळांवरील नवीन टर्मिनल इमारतींचे  उद्घाटन तसेच पायभरणी

प्रधानमंत्र्यांनी केले त्यांनीच 2021 मध्ये पायाभरणी केलेल्या लखनौ आणि रांची मधील लाईट हाऊस प्रकल्पाचे उद्घाटन

उत्तरप्रदेशात 19,000 कोटी रुपयांहून अघिक प्रकल्पांमुळे होणार रेल्वे आणि रस्त्ये यांच्याशी संबधित पायाभूत प्रकल्पांचे मजबूतीकरण

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेल्या  3700 कोटींहून अधिक खर्चाच्या 744 ग्रामीण रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण

पूर्वी उत्तर प्रदेश आणि देशातील कुटुंबियांचे जीवन सुखकर करण्यासाठी आमचे सरकार दिवसरात्र काम करत आहे

एकेकाळी मागास भागात गणला जाणारा आझमगढ हा भाग आज विकासाची नवा धडा घालून देणार

सरकारच्या सार्वजनिक योजना  महानगरे आणि लहान शहरे तसेच गावे यांच्या पलीकडे जातात त्याचप्रमाणे आम्ही आधुनिक पायाभूत , सुविधेचे काम निमशहरांपर्यंत आणले आहे.

देशाच्या विकासाची दिशा तसेच राजकारणाची दिशा उत्तरप्रदेश ठरवतो.

डबल इंजिव सरकारमुळे, उत्तरप्रदेशचे चित्र आणि भाग्य  दोन्हीत चांगला बदल झाला. उत्तरप्रदेश आज केंद्राच्या योजना उत्तमपणे राब

Posted On: 10 MAR 2024 1:52PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात आझमगढमध्ये 34,000 कोटींहून अधिक खर्चांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण तसेच पायाभरणी केली.शा प्रकारचा कार्यक्रम दिल्लीऐवजी आझमगढसारख्या ठिकाणी होत असल्याचा बदल झाल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. एकेकाळी मागास म्हणून गणल्या जाणाऱ्या आझमगढसारखा भाग आज विकासाचा नवीन अध्याय लिहीत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आझमगढ मध्ये आज 34000 कोटींहून अघिक प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी त्यांनी यावेळी केली.

देशभरातील 9800 कोटींहून अधिक खर्चांच्या 15 विमानतळ प्रकल्पांची पायाभरणी त्यांनी केली. देशभरातील पुणे, कोल्हापूर, ग्वाल्हेर, जबलपूर, दिल्ली, लखनौ, अलीगढ आझमगढ चित्रकूट, मोरादाबाद, श्रावस्ती आणि आदमपूर विमानतळांवरील 12 नव्या टर्मिनल इमारतींचे पंतप्रघानांनी उद्घाटन केले. कडाप्पा, हुबळी आणि बेळगावी या विमानतळांवरील म्हणजे तीन नवीन टर्मिनल इमारतींचे त्यांनी उद्घाटनही केले.  विमानतळांच्या बांधकामाच्या वेगाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले ग्वाल्हेर टर्मिनल केवळ 16 महिन्यात पूर्ण झाले. या कामांमुळे हवाई प्रवास सोपा होईल आणि देशाच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येईल, असे त्यांनी सांगितले. घोषित केलेले प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण केल्याने  हे प्रकल्प म्हणजे निवडणुकांसाठी असल्याचे दावे आपोआपच फेटाळले जातात असं ते म्हणाले. मोदी हे वेगळ्याच मातीचे बनले आहेत हे लोकांना दिसत आहे. विकसित भारत बनवण्यासाठी मी अथकपणे काम करत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले

विमानतळ, महामार्ग आणि रेल्वे यामधील पायाभूत सुविधांबरोबरच, शिक्षण, पाणी आणि पर्यावरणाच्या प्रकल्पांनाही आज गती मिळत आहे असं ते म्हणाले. आझमगढच्या लोकांना नवीन गॅरंन्टी देत पंतप्रधान म्हणाले, की आझमगढ हा  आजन्म विकासाचा गढ म्हणवून घेईल. स्थानिक बोलीभाषेत पेतप्रधान म्हणाले की विमानतळ, रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय यासाठी आझमगढला आता आजूबाजूच्या महानगरांवर अवलंबून रहायची गरज नाही.

हा भाग गेल्या दहा वर्षांमध्ये याआधीच्या खुशामतीच्या आणि घराणेशाहीच्या राजकारणाच्या जागी विकासाचे राजकारण अनुभवत आहे  असे प्रधानमंत्र्यांनी सांगितले. याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली नवी गती मिळत आहे असे पंतप्रधान म्हणाले. अलिगढ मोरादाबाद, आझमगढ श्रावस्ती यासारखे प्रदेश याआधी उत्तर प्रदेशातील मागास भाग म्हणून गणले जात होते तेआता सर्वांगिण विकासाबरोबरच हवाई मार्गाने जोडले गेले आहेत. जनकल्याण योजनांबरोबरच आधुनिक पायाभूत सुविधाही महानगरांच्या पुढे जात निमशहरे आणि गावामध्येही होत आहेत. मोठ्या महानगरांबरोबरच लहान शहरांनाही विमानतळ, चांगले महामार्ग असण्याचा आधिकार आहे.

शहरीकरण असेच विनाखंड सुरु रहावे म्हणून आम्ही दुय्यम आणि तिसऱ्या दर्जाच्या ( टार २ आणि टायर ३ ) दर्जाच्या शहरांचे बळ वाढवणार आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

या प्रदेशात कनेक्टीविटी आणि पायाभूत सुविधा यांचया महत्वावर पंतप्रधानांनी भर दिला. सीतापूर, शहाजहानगर, गाझीपूर आणि प्रयागराज यासारख्या जवळच्या जिल्ह्यांमधील अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्धाटन आणि पायाभरणी कार्यक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. आझमगढ, महू आणि बलियाला अनेक रेल्वे प्रकल्पांची भेट मिळाल्याचे ते म्हणाले. रेल्वे प्रकल्पांसोबतच पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण पायाभूत सुविधा विकासाच्या बाबतीत सरकारची कटीबद्धता आधोरेखित केली.  उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागातील अनेक शेतकरी आणि युवकांच्या  कनेक्टीविटीत सुधार करण्याचे हेतूने   प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 5000 किमीच्या रस्त्यांचे उद्घाटन झाले असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव देण्याच्या हमी हे सरकारचे लक्ष्य आहे असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. उसाचा उल्लेख करत  अशा अनेक पिकांच्या किमान हमी भावात पुरेशी वाढ झाल्याचं ते म्हणाले.  आज उसाच्या शेतकऱ्याला मिळणारा किमान हमीभाव हा ८ टक्क्यांनी वाढला असून क्विंटलला 340 रुपये झालाअसं ते म्हणाले.

त्याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी या भागातील उसाच्या शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागणाऱ्या अडचणींची उजळणी केली. या तक्रारींची तड लावण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवरही त्यांनी भर दिला.   उसाच्या शेतकऱ्यांची हजारोंची थकबाकी आमच्या सरकारने  दिली  आणि त्यांना वेळेवर तसेच योग्य रक्कम दिली. बायोगॅस आणि इथेनॉलमुळे आलेल्या बदलांचाही त्यांनी उल्लेख केला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी बद्दल सांगताना पंतप्रधानांनी फक्त आझमगढमध्ये 8 लाख शेतकऱ्यांना 2,000 कोटी रुपये या योजनेखाली मिळाले आहेत असे सांगितले.

सरकारी उपक्रमांच्या गतीशील प्रभावांवर प्रकाश टाकत पंतप्रधान मोदींनी जलद विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रशासनाच्या गरजेवर भर दिला. "अभूतपूर्व विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रशासन आवश्यक आहे. भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आणि पारदर्शक कारभार सुनिश्चित करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे." असे पंतप्रधान म्हणाले.

उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागासाठी सरकारच्या उपक्रमांच्या बदलत्या क्षमतेवर पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला.   "महाराजा सुहेलदेव शासकीय विद्यापीठाची स्थापना आणि इतर उपक्रम तरुणांना सक्षम करतील आणि या प्रदेशातील शैक्षणिक परिदृश्य बदलतील.", असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय राजकारण आणि विकासाला आकार देण्यात उत्तर प्रदेशाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याची प्रगती देशाच्या विकासाच्या मार्गाशी कशी जोडलेली आहे, यावर भर दिला.  दुहेरी इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली केंद्रीय योजनांच्या अनुकरणीय अंमलबजावणीसाठी आणि राज्याला या संदर्भात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्यांमध्ये स्थान मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशाची प्रशंसा केली.  गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशात केलेल्या महत्त्वपूर्ण गुंतवणूकीच्या  परिणाम स्वरुप पायाभूत सुविधांचा विकास आणि तरुणांसाठी असंख्य संधींची निर्मिती झाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.

विक्रमी स्तरावर होणारी गुंतवणुक, अनेक प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ तसेच द्रुतगती मार्गांचे जाळे आणि महामार्गांचा विस्तार यामुळे उत्तर प्रदेशाच्या बदलत्या चेहऱ्यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.  अयोध्येतील ऐतिहासिक राममंदिराच्या पूर्णत्वाचे उदाहरण देत  कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यावर राज्याचे लक्ष केंद्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशाची प्रशंसा केली.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी नागरी विमान वाहतूक क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी, 9800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक खर्चाच्या.  देशभरातील 15 विमानतळ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.  पुणे, कोल्हापूर, ग्वाल्हेर, जबलपूर, दिल्ली, लखनौ, अलीगढ, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद, श्रावस्ती आणि आदमपूर विमानतळाच्या 12 नवीन टर्मिनल इमारतींचे उद्घाटनही  पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी कडप्पा, हुबळी आणि बेळगाव विमानतळाच्या तीन नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी देखील केली.

या 12 नवीन टर्मिनल इमारतींची एकत्रित क्षमता वार्षिक 620 लाख प्रवाशांना सेवा देण्याची असेल, तर ज्या तीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी केली जात आहे, ती पूर्ण झाल्यावर, या विमानतळांची एकत्रित प्रवासी हाताळणी क्षमता दरवर्षी 95 लाख प्रवाशांपर्यंत वाढेल.  या टर्मिनल इमारतींमध्ये अत्याधुनिक प्रवासी सुविधा आहेत. या इमारती दुहेरी इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, ऊर्जेची बचत करण्यासाठी छतांची तरतूद, एलईडी लाइटिंग इत्यादी, यासारख्या विविध शाश्वत वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. या विमानतळांची रचना त्या राज्याच्या आणि शहराच्या वारसा संरचनेचे घटकांपासून प्रेरित आह. अशा रचनेतून या इमारती स्थानिक संस्कृती प्रतिबिंबित करतात आणि प्रदेशाचा वारसा अधोरेखित करतात.

पंतप्रधानांच्या मुख्य केंद्रित क्षेत्रांपैकी एक म्हणजे सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देणे. या दृष्टीकोनातून मार्गदर्शित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक नाविन्यपूर्ण माध्यम म्हणजे लाईट हाऊस प्रकल्पाची संकल्पना.  पंतप्रधानांनी लखनौ आणि रांची येथे लाइट हाऊस प्रकल्प (LHP) चे उद्घाटन केले होते. या प्रकल्प अंतर्गत आधुनिक पायाभूत सुविधांसह 2000 हून अधिक माफक दरातील सदनिका बांधण्यात आल्या आहेत.  या लाइट हाऊस प्रकल्पात वापरण्यात आलेले नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञान यात राहणाऱ्या कुटुंबांना शाश्वत आणि भविष्यकालीन जीवनाचा अनुभव देईल.  यापूर्वी पंतप्रधानांनी चेन्नई, राजकोट आणि इंदूर येथे अशाच प्रकारच्या लाईट हाऊस प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.  1 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या लाइट हाऊस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती.

रांची येथील लाइट हाऊस प्रकल्पासाठी, जर्मनीची प्रीकास्ट कॉंक्रीट बांधकाम प्रणाली - 3D व्हॉल्यूमेट्रिक तंत्रज्ञान वापरले गेले आहे.  रांची येथील लाइट हाऊस प्रकल्पाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक खोली स्वतंत्रपणे बनविली गेली आहे आणि नंतर संपूर्ण रचना लेगो ब्लॉक खेळण्यांसारखी जोडली गेली आहे.  LHP लखनौ येथील लाइट हाऊस प्रकल्पाची निर्मिती कॅनडाच्या स्टे इन प्लेस PVC फॉर्मवर्कचा वापर करून प्री-इंजिनीयर्ड स्टील स्ट्रक्चरल सिस्टमसह करण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 11,500 कोटी रुपयांच्या अनेक रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या  रस्ते प्रकल्पांमुळे संपर्क सुविधा सुधारेल, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि या क्षेत्राचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशमध्ये 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रस्ते प्रकल्पांची पायाभरणी  आणि लोकार्पण केले.  राष्ट्राला समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये चार पदरी लखनौ रिंगरोडचे तीन पॅकेज आणि राष्ट्रीय महामार्ग - 2 च्या अलाहाबाद ते चकेरी विभाग सहा पदरी करण्याचा समावेश आहे.  पंतप्रधानांनी रामपूर-रुद्रपूरच्या पश्चिम बाजूच्या चौपदरीकरणाची तसेच कानपूर रिंगरोडच्या सहा पदरी आणि राष्ट्रीय महामार्ग -24B आणि राष्ट्रीय महामार्ग-30 च्या रायबरेली-प्रयागराज विभागाच्या चौपदरीकरणाचे दोन पॅकेज यांची पायाभरणीही केली. या  रस्ते प्रकल्पांमुळे संपर्क सुविधा सुधारेल, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि या क्षेत्राचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

पंतप्रधानांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या 3700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सुमारे 744 ग्रामीण रस्ते प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांमुळे उत्तर प्रदेशातील 5,400 किमी पेक्षा जास्त ग्रामीण रस्त्यांचे एकत्रित बांधकाम होईल, ज्यामुळे राज्यातील सुमारे 59 जिल्ह्यांना फायदा होणार आहे.  यामुळे संपर्क सुविधा वाढेल आणि सामाजिक-आर्थिक विकासाला लक्षणीय चालना मिळेल.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी सुमारे 8200 कोटी रुपयांच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्र समर्पण आणि पायाभरणी केली. ज्या प्रकल्पांमुळे उत्तर प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल. पंतप्रधानांनी अनेक प्रमुख रेल्वे विभागांचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण राष्ट्राला समर्पित केले.  ते भटणी-पियोकोल बायपास मार्ग देखील राष्ट्राला समर्पित करतील ज्यामुळे भटणी येथे इंजिन वळवण्याची समस्या संपेल आणि विना अडथळा गाड्या चालवणे सुलभ होईल.  बहराइच-नानपारा-नेपाळगंज रोड रेल्वे विभागाच्या गेज परिवर्तनाच्या कामाचीही पंतप्रधानांनी पायाभरणी केली.  हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, हा प्रदेश ब्रॉडगेज लाइनद्वारे महानगरांशी जोडला जाईल ज्यामुळे वेगवान विकासाला चालना मिळेल.  गंगा नदीवरील रेल्वे पुलासह गाझीपूर शहर आणि गाझीपूर घाट ते तारीघाट या नवीन रेल्वे मार्गाचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. पंतप्रधान गाझीपूर सिटी - तारिघाट - दिलदार नगर जंक्शन दरम्यान मेमू ट्रेन सेवेला हिरवा झेंडा दाखवतील.

याशिवाय, पंतप्रधानांनी प्रयागराज, जौनपूर आणि इटावा येथे अनेक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि अशा इतर प्रकल्पांचे उद्घाटन तसेच राष्ट्र समर्पण केले.

***

G.Chippalkatti/V.Sahajrao/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013232) Visitor Counter : 83