भूविज्ञान मंत्रालय
नैसर्गिक आपत्तींचे मानवी जीवनावरील परिणाम कमी करण्यासाठी आपत्ती प्रतिबंधक धोरण आखण्याची गरज केन्द्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केली व्यक्त
Posted On:
10 JAN 2023 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जानेवारी 2023
नैसर्गिक आपत्तींचे मानवी जीवनावरील परिणाम कमी करण्यासाठी आपत्ती प्रतिबंधक धोरण आखण्याची गरज केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे. "पृथ्वीला असलेले धोके" या विषयावरील 2 दिवसीय भारत-यूके कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते. दिल्लीतील भारत-यूके संयुक्त कार्यशाळेत डॉ जितेंद्र सिंह यांनी ही भूमिका मांडली. नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयात, भारतातील ब्रिटिश उपउच्चायुक्त क्रिस्टीना स्कॉट यांनी यावेळी यूके शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

"पृथ्वीला असलेले धोके" या विषयावरील संयुक्त भूविज्ञान कार्यशाळा अशा वेळी होत आहे जेव्हा भारत उत्तराखंडमधील जोशीमठ घटनेचा सामना करत आहे. तिथे पृथ्वी विज्ञान मंत्रालय इतर संस्थांसह या समस्येचे निराकरण करण्यात गुंतलेले आहे. हा एक सूचक योगायोग असल्याचे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार भूविज्ञान मंत्रालयाने सक्रिय भूमिका स्वीकारली आहे. गेल्या दोन वर्षांत 37 नवीन भूकंपविज्ञान केंद्रे (वेधशाळा) स्थापन केली आहेत आणि आता भारतात व्यापक निरीक्षण सुविधांसाठी अशी 152 केंद्रे आहेत असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. या केन्द्रांमधे परिणामाभिमुख विश्लेषणासाठी माहितीच्या प्रचंड साठ्याचे संकलन केले जाते. त्या माहितीचे त्याचवेळी निरीक्षण केले जाते. या माहिती आणि आकडेवारीचे संकलन सुधारण्यासाठी पुढील 5 वर्षांत देशभरात अशी आणखी 100 भूकंपविज्ञान केंद्रे उघडली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. भूकंपशास्त्रीय प्रगती आणि याबाबतचे ज्ञान समजून घेण्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याच्या अधिकाधिक जवळ जात आहे, असेही ते म्हणाले.

भूकवच आणि त्याखालील ठिसूळ थर निकामी होण्याच्या भौतिक प्रक्रियेवर मूलभूत संशोधनाची निकड आहे असे डॉ जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले. पृथ्वीच्या विस्तीर्ण प्रदेशाला असलेले धोके ओळखण्यासाठी आणि त्यांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी किफायतशीर उपाय विकसित करणे, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक संदर्भांच्या अनुषंगाने - वेगाने विकसित होत असलेली - व्यापकपणे बदलण्यासाठी योग्य असलेली आपत्ती प्रतिबंधक धोरणे तयार करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. गेल्या 50 वर्षांत आपत्तींमागील प्रक्रियेची वैज्ञानिक समज मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भविष्यात अशा आपत्तींशी लढण्यासाठी भारत-यूके पुढाकारासारखे आणखी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भूकंप, भूस्खलन आणि सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तींशी संबंधित जोखमी कमी करण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी, पृथ्वीला असलेल्या धोक्यांबाबत भारतीय शास्त्रज्ञांचे युकेआरआय समकक्षांसोबतचे सखोल सहकार्य आपली समज अधिक समृद्ध करेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी या संयुक्त कार्यशाळेसाठी ब्रिटीश उच्चायुक्तांचे आभार मानले आणि नमूद केले की, भारतातील अशा शैक्षणिक सहभागामुळे तरुण संशोधकांमध्ये नव्याने उत्साह वाढेल आणि त्यांच्यात सहकर्याची भावना निर्माण करण्यास मदत होईल आणियामुळे ते बहु-विद्याशाखीय विज्ञान प्रस्ताव तयार करण्यास सक्षम होतील, ज्याचे परिणाम आपल्याला आपल्या ग्रहाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्याने आणि नवीन वैज्ञानिक उपायांच्या शस्त्रासह समृध्द झाल्याने भविष्यात पुढे जाण्यास मदत करतील. मंत्री पुढे म्हणाले की, पृथ्वीच्या प्रक्रियेमागील परस्परसंबंधित भौतिकशास्त्र आणि तिच्या अंतर्गत गतिशीलतेच्या वाढत्या जाणिवेमुळे, वैज्ञानिक पृथ्वी विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमधील संयुक्त संशोधनाच्या सीमांना पार करून उत्साहाने पुढे जात आहेत.

क्रिस्टीना स्कॉट यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भूकवचविषयक-आपत्तींना तोंड देण्याची क्षमता निर्माण करणे हे एक मोठे आव्हान आहे ज्यासाठी संशोधक, धोरणकर्ते, सरकारे, खाजगी क्षेत्रे आणि नागरी समाज यांच्याद्वारे सहकार्याची आंतरराष्ट्रीय कृती आवश्यक आहे. त्या म्हणाल्या की, या संदर्भात, ब्रिटनचे पृथ्वी अभ्यास करणारे शास्त्रज्ञ भारतातील सध्याच्या भूकवचविषयक-आपत्तींसंदर्भात भूगर्भातील हालचाली आणि त्याच्या परिणामाविषयी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. या कार्यशाळेच्या फलनिष्पत्तीमधून समाजाशी निगडित विविध वैज्ञानिक समस्यांचा भारतासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी ब्रिटिश समकक्षासोबत संयुक्तपणे अभ्यास केला जाईल, असे स्कॉट म्हणाल्या.
या कार्यशाळेला भेट देणाऱ्या ब्रिटनच्या तज्ञ/शास्त्रज्ञांच्या गटाशी संवाद साधण्यासाठी, परस्पर सहयोग विकसित करण्यासाठी आणि पृथ्वीला असलेल्या भूकवच संबंधित धोक्यांवर निश्चित असा संशोधन प्रकल्प तयार करण्यासाठी,भूविज्ञान मंत्रालयाने (MoES) नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नवी दिल्ली, बोरहोल जिओफिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (BGRL) कराड, नॅशनल सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज (NCESS) तिरुवनंतपुरम आणि राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) गोवा यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शास्त्रज्ञांचा एक गट तयार केला आहे.
दोन दिवसांच्या कार्यशाळेत दोन्ही देशांतील तज्ज्ञ/शास्त्रज्ञ पृथ्वीवरील भूकवच संबंधित धोक्याच्या विविध पैलूंवर चर्चा करतील. संशोधनाच्या या कार्यक्रमासाठी लक्ष केंद्रित करण्याच्या संभाव्य क्षेत्रांमध्ये इतर विषयांचा समावेश असू शकते, परंतु ते विषय एवढ्यावरच मर्यादित नाहीत- खडक भंगण्याचे भौतिकशास्त्र:ज्यात भूकंप, भूस्खलन, प्रयोगशाळेतील डेटा एकत्र करणे, रिमोट सेन्सिंग आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्र निरीक्षणे; भू-धोके ओळखण्यासाठी पृथ्वी निरीक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) तंत्रांचा विकास, नकाशातील मर्म ओळख , उपशमन धोरण राबवणे आणि आपत्तींवरील प्रतिक्रियांवर मार्गदर्शन करणे; निसर्गाच्या विकृतीचे निरीक्षण करण्यासाठी सेन्सर तंत्रज्ञान; धोके आणि जोखमींचे सुधारित प्रमाणीकरण; डायनॅमिक परिस्थिती - भू-धोक्यांना प्रतिसाद म्हणून शहरे आणि प्रदेशांच्या दीर्घकालीन विकासाचे मार्गदर्शन; त्सुनामी-जोखीम झोनची धोका संभाव्यता; जीपीएस तंत्रज्ञान वापरून टीइसी (TEC) चा अभ्यास करून आयनोस्फेरिक डिस्टर्बन्सचा अभ्यास आणि रिअल टाइम जीपीएस(GPS) आणि एसएमए (SMA)डेटा वापरून फोकल यंत्रणांचा अभ्यास करणे यांचा समावेश आहे.
* * *
S.Patil/V.Ghode/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1890120)