कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
सर्वसामान्यांवर मोठा सामाजिक-आर्थिक प्रभाव असलेल्या सर्व केंद्रीय योजनांची 100% अंमलबजावणी साध्य करण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये काम करत आहे- एनसीजीजी महासंचालक भरत लाल
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2023 2:22PM by PIB Mumbai
सर्वसामान्यांवर मोठा सामाजिक-आर्थिक प्रभाव असलेल्या सर्व केंद्रीय योजनांची 100% अंमलबजावणी साध्य करण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये काम करत आहे असं राष्ट्रीय सुशासन केंद्राचे महासंचालक भरत लाल यांनी म्हटले आहे.
इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद येथे 'सार्वजनिक धोरण, प्रशासन व्यवस्था आणि नवोन्मेष ' या विषयावरील आपल्या बीज भाषणात लाल म्हणाले की, गेल्या साडेआठ वर्षांत पिण्याचे पाणी, वीज, स्वयंपाकाचा गॅस, गाव आणि पंचायत स्तरावर इंटरनेट जोडणी अशा विविध सेवांच्या सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्न सुरू असून हे चांगल्या आणि सक्षम प्रशासनाचे उदाहरण आहे.
लाल पुढे म्हणाले,"डिजिटल आरोग्य असो, पंचायत वा गाव पातळीवरील इंटरनेट असो, स्टार्ट-अप्स परिसंस्था आणि मुद्रा कर्जाच्या माध्यमातून नवा भारत उदयास येत आहे आणि जनसेवक या नात्याने लोकांना त्याचा लाभ मिळवून देणे हे आपले परम कर्तव्य आहे ."
कोणतेही सार्वजनिक धोरण योग्य प्रशासनाअभावी आपले उद्दिष्ट साध्य करू शकत नाही आणि आजच्या युगात जर त्यात नावीन्यता आणली नाही तर अपेक्षित उद्दिष्ट गाठणे अशक्य आहे, असे सांगत लाल यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
****
S.Kane/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1889569)
आगंतुक पटल : 253