पर्यटन मंत्रालय

व्यापक लसीकरण मोहिमेच्या यशामुळे भारत सुरक्षित पर्यटन स्थळ बनले आहे. लंडनमधील वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट 2022 मध्ये झाले अधोरेखित


जी -20 अध्यक्षपद भारताच्या पर्यटन क्षेत्राला भारतातील पर्यटन क्षमता प्रदर्शित करण्याची अतुलनीय संधी देईल

Posted On: 09 NOV 2022 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2022

लंडनमधील वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट 2022 मध्ये, सहल संचालक, ट्रॅव्हल एजंट आणि प्रसारमाध्यमे यांसारख्या जागतिक पर्यटन उद्योगातील भागधारकांना भारतातील विविध पर्यटन संधींचे सादरीकरण करण्यात येत आहे. शाश्वत पर्यटनाला चालना देणे, पर्यटन क्षेत्राचे डिजिटलायझेशन, पर्यटन एमएसएमई आणि कौशल्ये विकसित करण्यावर भारताचा प्रामुख्याने भर असल्याचे लंडन मध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट मध्ये माध्यमांच्या मंचातून अधोरेखित केले जात आहे.

कोविड- 19 नंतर एक सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटमध्ये भारताचा प्रचार केला जात आहे. जी -20 चे अध्यक्षपद भारताच्या पर्यटन क्षेत्राला   भारताची पर्यटन क्षमता अधोरेखित करण्याची अभूतपूर्व संधी देईल.

भारत सरकारचे पर्यटन मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राकेश कुमार वर्मा यांनी वरील सर्व मुद्द्यांवर भर दिला. मंगळवारी मीडिया सेंटर, ExCeL,लंडन येथे वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट 2022 मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सुरुवातीला अतिरिक्त सचिवांनी , पत्रकार परिषद आयोजित केल्याबद्दल आणि परिषद घेणाऱ्या सर्व देशांशी यशस्वीपणे समन्वय साधल्याबद्दल वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटचे अभिनंदन केले. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यात प्रसारमाध्यमांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचीही  त्यांनी प्रशंसा केली. त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत लंडन येथे वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट (WTM) 2022 मध्ये सहभागी होत आहे आणि भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व भारत सरकारचे सचिव अरविंद सिंग करत असून  त्यात पर्यटन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि भारतीय प्रवास आणि पर्यटन भागधारकांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट (WTM) 2022 मध्ये , भारतीय प्रतिनिधिमंडळ टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट आणि प्रसारमाध्यमे यांसारख्या  जागतिक पर्यटन उद्योगातील भागधारकांना  भारतातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देत आहे. शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी, पर्यटन क्षेत्राचे डिजिटलायझेशन, पर्यटन एमएसएमई आणि कौशल्य विकास यावर भारत कसा भर देत आहे याची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली.

विशेषत: कोविड महामारीनंतर पर्यटन क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्याचे आणि 2030 च्या शाश्वत विकासाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी संक्रमणाला गती देण्याचे पर्यटन मंत्रालयाचे उद्दिष्ट  आहे.

 

  

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1874824) Visitor Counter : 167


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu