सांस्कृतिक मंत्रालय

इंदिरा गांधी राष्ट्रीय कलाकेंद्र (IGNCA)यांच्या वतीने तर्फे आज "फाळणीच्या भयावह आठवणी दिन("Partition Horrors Remembrance Day) या निमित्ताने एक दिवसाच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे करण्यात आले आयोजन

Posted On: 05 AUG 2022 7:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022

इंदिरा गांधी राष्ट्रीय कलाकेंद्र (IGNCA) यांच्या वतीने आज नवी दिल्ली येथे "आझादी का अमृत महोत्सव" या कार्यक्रमांतर्गत "फाळणीच्या भयावह आठवणी दिन" (Partition Horrors Remembrance Day) या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या प्रसंगी इंटिग्रेटेड इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन फिलॉसॉफी रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष महेशचंद्र शर्मा यांनी फाळणीच्या भीषण संकटाची आठवण काढली.

फाळणीच्या काळात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले तर कित्येक जण उद्ध्वस्त झाले, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की फाळणीचे परिणाम आणि आघात आजपर्यंत जाणवतात आणि ते अनुभवणारे अद्याप आहेत.

या चर्चेत इतिहासकार श्री कृष्णानंद सागर म्हणाले की, ऑगस्ट 1947 मध्ये ब्रिटिश भारतातून बाहेर पडत असताना, देशाची दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये फाळणी झाली.भारताच्या फाळणीमुळे संपूर्ण भारतीय उपखंडातील लाखो लोक उध्वस्त झाले, असेही त्यांनी नमूद केले.

भारताच्या फाळणीच्या शोकांतिकेसंदर्भात सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1848873) Visitor Counter : 143


Read this release in: English , Urdu , Hindi