ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
गोव्यात भारतीय साखर तंत्रज्ञ संघटनेचे 80 वे वार्षिक अधिवेशन
“आता आपण साखर क्षेत्रात “आत्मनिर्भर” असण्यासह इतर देशांनाही निर्यात करतो" - साध्वी निरंजन ज्योती
गोवा येथे 28 आणि 29 जुलै 2022 रोजी भारतीय साखर तंत्रज्ञ संघटनेचे 80वे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
Posted On:
29 JUL 2022 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2022
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री, साध्वी निरंजन ज्योती यावेळी उपस्थित होत्या. भारत सरकारची धोरणे पुढे नेत ती अंमलात आणण्यासाठी साखर उद्योगाने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा साध्वी निरंजन ज्योती यांनी केली, परिणामी पेट्रोलमध्ये 10% इथेनॉलचे मिश्रीत करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. आता आपण साखर क्षेत्रात “आत्मनिर्भर” असण्यासह इतर देशांनाही साखर निर्यात करत आहोत, असे त्या म्हणाल्या.तसेच, उत्पादकता सुधारण्यासाठी आणि त्याचे फायदे प्रत्येक भागधारकापर्यंत पोहोचतील ते सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला शेतापासून कारखान्यापर्यंतच्या स्तरावर काम करावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्याच्या दृष्टीकोनानुसार नियोजन आणि स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत भारताला विकसित देशांच्या दर्जाच्या नजीक आणण्यासाठी, भारत सरकार @ 2047 या विस्तृत आराखड्यावर काम करत आहे. हा आराखडा विविध आर्थिक क्षेत्रांसाठी विशिष्ट उद्दिष्टे निश्चित करेल आणि यात साखर उद्योगाची भूमिका लक्षात घेता त्या दृष्टिकोनातून योजना तयार करणे आवश्यक आहे, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले.
या वार्षिक अधिवेशनाला देश-विदेशातील 1000 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. साखर आणि इथेनॉल संयंत्र यंत्रसामग्री, ऊस तोडणी उपकरणांचे उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या 78 कंपन्या आणि तंत्रज्ञान प्रदातेही या अधिवेशनातही सहभागी झाले होते. इथेनॉलचे महत्त्व लक्षात घेता , भारतीय साखर उद्योगाला जैव-ऊर्जेचे केंद्र म्हणून रूपांतरित करण्याचे मार्ग आणि माध्यमांवर चर्चा करण्यासाठी एक समर्पित सत्र आयोजित करण्यात आले होते.

उद्घाटन सत्रादरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात, गोवा येथे अधिवेशन आयोजित केल्याबद्दल भारतीय साखर तंत्रज्ञ संघटनेची प्रशंसा केली. हे अधिवेशन या क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि जुन्या साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी प्रेरणा देईल, असे ते म्हणाले. साखर उद्योगाचा मोठ्या प्रमाणात कायापालट करून सद्यस्थितीत ते व्यवहार्य बनवण्यात शास्त्रज्ञांच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तंत्रज्ञान हे अनेक समस्यांवर उपाय ठरणार आहे आणि साखर उद्योगाकडे या अनुषंगाने पुढचा दृष्टिकोन असायला हवा, असेही ते म्हणाले.
* * *
R.Aghor/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846311)