आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्र सरकारच्या ई-संजीवनी उपक्रमाद्वारे 80 लाखांहून अधिक रुग्णांना सेवा पुरवण्यात आली
Posted On:
23 JUL 2021 5:54PM by PIB Mumbai
भारत सरकारची ई संजीवनी ही राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. 80 लाख दूरध्वनी-सल्ला मसलती पूर्ण करून त्याने आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. सध्या राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा 35 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे आणि दररोज देशभरातील 60 हजारांहून अधिक रूग्ण राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील शासकीय आरोग्य सेवा यंत्रणेकडून आरोग्य सेवा मिळवण्यासाठी याचा वापर करत आहेत.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्थापन केलेली नॅशनल टेलीमेडिसिन सेवा दोन टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मद्वारे दोन प्रकारची टेलि-मेडिसिन सेवा प्रदान करत आहे. ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी (डॉक्टर-डॉक्टर टेलिकन्सलटेशनसाठी) हब आणि स्पोक मॉडेलवर आधारित आहे आणि ईसंजीवनीओपीडी (रूग्ण - डॉक्टर टेलिकन्सलटेशन) नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये बाह्यरुग्ण सेवा प्रदान करते.
नोव्हेंबर 2019 मध्ये, केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. डिसेंबर 2022 पर्यंत देशातील 1,55,000 आरोग्य व कल्याण केंद्रांवर ती कार्यरत होईल. त्याची अंमलबजावणी झाल्यापासून, ई-संजीवनीएबी-एचडब्ल्यूसी सुमारे 25000 आरोग्य व कल्याण केंद्रावर कार्यरत आहे आणि वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यासह सुमारे 2000 केंद्रांवर ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसीने सुमारे 39 लाख कन्सलटेशन पूर्ण केल्या आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738281)
Visitor Counter : 140