अंतराळ विभाग

गगनयान कार्यक्रमामुळे मानवांना अंतराळात पाठविण्याची कल्पना प्रत्यक्षात येईल: डॉ.जितेंद्र सिंग

Posted On: 18 MAR 2021 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मार्च 2021


गगनयान कार्यक्रमामुळे मनुष्यांना अंतराळात पाठविण्याची कल्पना प्रत्यक्षात येईल असे केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक,सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले. राज्यसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आज एक निवेदन सादर केले. मानवांना भारतीय प्रक्षेपकांच्या मदतीने पृथ्वीच्या छोट्या कक्षेत नेणे आणि तिथून सुरक्षितरित्या पृथ्वीवर परत आणणे यासाठीची क्षमता तपासणे हा गगनयान कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.   

प्रक्षेपक, अवकाशयानाचे व्यवस्थापन आणि त्यासाठी भूमीवरील आवश्यक पायाभूत सुविधा  इत्यादींच्या संदर्भात इस्रोकडे तंत्रज्ञानविषयक बाबींचा मोठा अनुभव आहे आणि यानातील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मानवी वाहतुकीच्या संदर्भात विद्यमान प्रणालींची क्षमता तपासण्यासाठी इस्रोने काही पावले उचलली आहेत अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने अनेक भारतीय संशोधक महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत याचा भारताला अत्यंत अभिमान आहे असे सांगत त्यांनी या संशोधकांच्या विशेष अनुभवांचा समाजाला उपयोग करून देणारा प्रस्ताव सादर झाला तर भारत सरकार या प्रस्तावाचा अत्यंत सकारात्मकरित्या विचार करेल अशी ग्वाही सिंग यांनी दिली आहे.

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705824) Visitor Counter : 135