भारतीय निवडणूक आयोग

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत निवडणूक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत  ईसीआयचे निर्देश

Posted On: 15 JAN 2021 9:58PM by PIB Mumbai

 

मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात थेट काम करणारे काही अधिकारीज्यात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आणि संयुक्त  मुख्य निवडणूक अधिकारी इत्यादींना निवडणूक संपल्यानंतर त्रास दिला जातो असे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. अशा बहुतांश घटनांमध्ये संबंधित, अधिकाऱ्यांनी  मुक्त, प्रामाणिक आणि नैतिक मूल्यांचे पालन करत  निवडणुका पार पडाव्यात यासाठी निष्पक्षपणे आपले कर्तव्य बजावले आहे.  या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर आणि अशा विशिष्ट घटना लक्षात घेऊन आयोगाने 15-01-2021 रोजी जारी आपले  पत्र क्र.154/2020 द्वारे सर्व संबंधित लोकांना एक निवेदन दिले आहे:

1.जर मुख्य निवडणूक अधिकारी आणि संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी पदापर्यंतच्या अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यकाळादरम्यान आणि त्यांच्याकडून शेवटची निवडणूक पार पडल्यापासून एक वर्षापर्यंत एखादी शिस्तपालन कारवाई केली जात असेल तर  राज्य/ केंद्रशासित सरकारांना आयोगाकडून आधी मंजुरी घ्यावी लागेल.

2. आयोगाने  निर्देश दिले आहेत की राज्य/ केंद्रशासित प्रदेश सरकारला मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला जबाबदारी पार पाडण्यासाठी पुरवण्यात आलेल्या  वाहन, सुरक्षा आणि अन्य सुविधा कमी करता येणार नाही.

आयोगाने अपॆक्षा व्यक्त केली आहे की सर्व संबंधितांकडून या निर्देशांचे कठोर  पालन केले जाईल.

या निर्देशांची  एक प्रत ईसीआयच्या संकेतस्थळावर  https://eci.gov.in  उपलब्ध आहे.

 

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688946) Visitor Counter : 127