पंतप्रधान कार्यालय

80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्रात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 26 NOV 2020 11:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  26 नोव्हेंबर 2020

नमस्‍कार,

गुजरातचे  राज्यपाल आचार्य देवव्रत , लोकसभेचे सभापती ओम बिरला , संसदीय कामकाज  मंत्री  प्रह्लाद जोशी , राज्यसभा उपाध्यक्ष  हरिवंश जी, संसदीय कामकाज मंत्री  अर्जुन मेघवाल , गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी देशातील विविध विधिमंडळांचे  पीठासीन अधिकारी , अन्य महानुभाव, स्त्री आणि पुरुषगण

आज नर्मदा नदीच्या किनारी सरदार पटेल यांच्या सान्निध्यात दोन अतिशय महत्वाच्या घटनांचा संगम होत आहे. संविधान दिनानिमित्त माझ्या सर्व देशबांधवांना शुभेच्छा. आपल्या संविधान निर्मितीत सहभाग असलेल्या सर्व महान स्त्री-पुरुषांना आपण आदरांजली वाहतो. आज संविधान दिन  आहे आणि  संविधानाच्या संरक्षणात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या तुम्हा पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद देखील आहे. हे  वर्ष पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचे शताब्दी वर्ष देखील आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा .

मित्रानो

आज डॉक्टर राजेन्द्र प्रसाद आणि  बाबा साहेब आंबेडकर यांच्यासह  संविधान सभेच्या त्या सर्व व्यक्तींना वंदन करण्याचा दिवस आहे. ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आपणा सर्व  देशवासियांना संविधान मिळाले. आजचा दिवस  पूज्य बापूंच्या प्रेरणेला, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वचनबद्धतेला प्रणाम करण्याचा दिवस आहे. अशाच अनेक दूरदर्शी प्रतिनिधिनी  स्वतंत्र भारताच्या नवनिर्माणाचा मार्ग ठरवला होता. देशाने त्या प्रयत्नांची आठवण ठेवावी या उद्देशाने 5 वर्षांपूर्वी  26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मी संपूर्ण देशाला  आपल्या लोकशाहीच्या या महत्वपूर्ण पर्वासाठी शुभेच्छा देतो.

मित्रानो,

आजची तारीख, देशावरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याशी देखील निगडित आहे. 2008 मध्ये पाकिस्तानमधून आलेल्यापाकिस्‍तानने पाठवलेल्या दहशतवाद्यानी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक देशांचे लोक मारले गेले होते. मी मुंबई हल्ल्यात मारले गेलेल्या सर्व लोकांना  श्रद्धांजलि अर्पित करतो. या हल्ल्यात आपल्या पोलीस दलाचे अनेक वीर देखील शहीद झाले होते. मी त्यांना देखील वंदन करतो. मुंबई हल्ल्याच्या जखमा भारत विसरू शकत नाही. आता आजचा भारत नव्या धोरण-रीतींसह दहशतवादाचा सामना करत आहे. मुंबई हल्ल्यासारखे कट अयशस्वी करत आहे. दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या, भारताच्या रक्षणात प्रत्येक क्षण वेचणाऱ्या आपल्या सुरक्षा दलांना देखील मी आज वंदन करतो.

मित्रानो, पीठासीन  अधिकारी म्हणून आपल्या लोकशाहीत तुमची प्रमुख भूमिका आहे. तुम्ही सर्व पीठासीन अधिकारी, कायदे करणारे म्हणून  संविधान आणि देशाच्या सामान्य माणसाला जोडणारी एक खूप महत्वाची साखळी आहात . आमदार असण्याबरोबरच तुम्ही सभागृहाचे अध्यक्ष देखील आहात . अशात आपल्या संविधानाच्या तीन महत्वपूर्ण घटकांमध्ये - विधानमंडळकार्यपालिका आणि  न्यायपालिका यांच्यात उत्तम  सामंजस्य स्थापित करण्यात तुम्ही अतिशय महत्वाची भूमिका पार पाडू शकता. तुम्ही तुमच्या परिषदेत यावर बरीच चर्चा केली आहे.  संविधानाच्या रक्षणात  न्यायपालिकैची स्वतःची भूमिका असते. मात्र अध्यक्ष कायदा निर्मिती संस्थेचा चेहरा असतो. म्हणूनच अध्यक्ष हा एक प्रकारे संविधानाच्या सुरक्षा कवचचा पहिला पहारेकरी देखील असतो.

मित्रानो,

संविधानाच्या तिन्ही घटकांच्या भूमिकेपासून मर्यादांपर्यंत सगळे काही संविधानात नमूद केलेले आहे.  70 च्या दशकात आपण पाहिले होते की  कशा प्रकारे अधिकार  विकेंद्रीकरणाची  मर्यादा भंग करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र याला उत्तर देखील देशाला संविधानातूनच मिळाले. उलट आणीबाणीच्या त्या काळात  Checks and Balance  अर्थात अंकुश आणि समतोल ही  व्यवस्था अधिक मजबूत होत गेली. विधानमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका, या तिघांनीही त्या कालखंडात खूप काही शिकून पुढे वाटचाल सुरु ठेवली. आजही ती शिकवण तेवढीच  कालसुसंगत  आहे. गेल्या 6-7 वर्षात विधानमंडळ , कार्यपालिका आणि  न्यायपालिका यांच्यातील  सामंजस्य अधिक दृढ करण्याचा प्रयत्न झाला आहे. 

मित्रानो,

अशा प्रकारच्या प्रयत्नांचा सर्वात मोठा प्रभाव जनतेच्या विश्वासावर पडतो.  अगदी कठीण काळातही जनतेची आस्था या तीन स्तंभांवरकायम असते.  हे आपण या जागतिक महामारीच्या काळात अनुभवले आहे. भारताच्या  130 कोटींहून अधिक जनतेने ज्या  परिपक्वतेचा प्रत्यय दिला त्याचे एक प्रमुख कारण  भारतीयांचा संविधानाच्या तिन्ही स्तंभांवर  पूर्ण विश्वास आहे. हा विश्वास वाढवण्यासाठी  निरंतर काम देखील झाले आहे.

महामारीच्या या काळात देशाच्या संसदेने  राष्ट्रहिताशी संबंधित कायद्यांसाठी , आत्मनिर्भर भारतासाठी , महत्वपूर्ण कायद्यांसाठी जी  तत्परता आणि वचनबद्धता दाखवली आहे ती अभूतपूर्व आहे. या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम झाले. खासदारांनी आपल्या वेतनात देखील कपात करून आपली वचनबद्धता दाखवून दिली. अनेक राज्यांच्या आमदारांनी देखील आपल्या वेतनातील काही हिस्सा देऊन   कोरोना विरुद्ध लढाईत आपले सहकार्य दिले आहे. मला या सर्व प्रयत्नांची प्रशंसा करायची आहे. कोविड काळात जनतेचा विश्वास वाढवण्यात या उपायांनी प्रमुख भूमिका पार पाडली  आहे.

मित्रानो,

कोरोनाच्या या काळात आपल्या निवडणूक यंत्रणेची  मजबूती देखील जगाने पाहिली आहे. एवढ्या मोठ्या स्तरावर निवडणुका होणे, वेळेवर निकाल जाहीर होणे, सुरळीतपणे नवे सरकार स्थापन होणे हे एव्हढे सोपे देखील नाही आहे. आपल्याला आपल्या  संविधानातून जी ताकद मिळाली आहे ती अशी अनेक कठीण कामे सोपी बनवते. आपले  संविधान 21 व्या शतकातील बदलत्या काळाच्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत राहो. नव्या पिढीशी त्याचे बंध दृढ व्हावेत ही आपली  सर्वांची जबाबदारी आहे.

आगामी काळात  संविधान 75 वर्षांच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. त्याच प्रमाणे स्वतंत्र भारत देखील 75 वर्षांचा होणार आहे. अशात व्यवस्थांना काळानुरूप बनवण्यासाठी मोठी पावले उचलण्यासाठी आपल्याला संकल्पित भावनेने काम करावे लागेल. राष्ट्रासाठी करण्यात आलेले प्रत्येक संकल्प सिध्दीला नेण्यासाठी विधानमंडळ, कार्यपालिका आणि  न्यायपालिका, याना उत्तम ताळमेळासह  काम करत राहायचे आहे. आपल्या प्रत्येक निर्णयाचा आधार एकाच तराजूतून तोलला जायला हवा, एकच निकष असावेत आणि ते निकष आहेत राष्ट्रहित .  राष्ट्रहित, हाच आपला  तराजू असायला हवा.

आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की  जेव्हा विचारांमध्ये  देशहित, लोकहित नाही तर राजकारण वरचढ होते तेव्हा त्याचे नुकसान देशाला भोगावे लागते. जेव्हा प्रत्येकजण वेगळा विचार करतो, तेव्हा काय परिणाम होतात, त्याचा साक्षीदार ...  तुम्ही दोन दिवसांपासून इथे विराजमान आहात, ते सरदार सरोवर धरण  देखील त्याचे एक खूप मोठे उदाहरण आहे.

मित्रानो,

केवडिया प्रवासादरम्यान तुम्ही सर्वानी  सरदार सरोवर धरणाची  विशालता पाहिली आहे. भव्यता पाहिली आहे, त्याची  शक्ति पाहिली आहे. मात्र या धरणाचे काम अनेक वर्षे अडकले होते, रखडलेले होते. स्वातंत्र्यांनंतर काही वर्षातच हे काम सुरु झाले होते आणि स्वातंत्र्याची 75 वर्षे जवळ आली असताना काही वर्षे आधी ते पूर्ण झाले आहे. कितीतरी संकटे, कशा-कशा प्रकारच्या लोकांकडून अडथळे, कशा प्रकारे संविधानाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न  झाला आणि  एवढा मोठा प्रकल्प, लोकहिताचा प्रकल्प इतकी वर्षे रखडला.

आज या धरणाचा लाभ गुजरात बरोबरच  मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि  राजस्थानच्या लोकांना मिळत आहे.  या धरणामुळे  गुजरातच्या 10 लाख हेक्टर जमिनीला राजस्थानच्या अडीच लाख हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा  सुनिश्चित झाली आहे.  गुजरातची  9 हजार पेक्षा अधिक गावेराजस्थान आणि  गुजरातच्या अनेक लहान मोठ्या शहरांना घरात पाणीपुरवठा याच सरदार सरोवर धरणामुळे होऊ शकला आहे.

जेव्हा पाण्याचा विषय निघतो, तेव्हा मला एक प्रसंग आठवतो. जेव्हा नर्मदेचे पाणी अनेक वादांमध्ये फसले होते, अनेक संकटांमधून  पार पडले