ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

2020-21 च्या खरीप विपणन हंगामात किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी सुरु


2020-21 खरीप विपणन हंगामात तांदूळ खरेदीला चांगला वेग,एक कोटी मेट्रिक टनाहून जास्त खरेदी

कापसाच्या 66,842 लाख रुपयांच्या 2,36,748 गासड्याची आजपर्यंत खरेदी

Posted On: 21 OCT 2020 5:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020

केंद्र सरकार गेल्या हंगामाप्रमाणेच 2020-21 च्या खरीप पिकांची, सध्याच्या किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करत आहे.  2020-21 च्या खरीप विपणन हंगामासाठी  तांदूळ खरेदीला चांगला वेग आला असून, 7 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातल्या  9.37 लाख शेतकऱ्यांकडून 20,180 कोटीहून अधिक मूल्याचा, प्रती मेट्रिक टन 18,880 रुपये किमान आधारभूत किमतीच्या 106 लाख मेट्रिक टन  तांदळाची खरेदी केल्यानंतर  या खरेदीने एक कोटी मेट्रिक टनाचा टप्पा ओलांडला आहे. 2019-20 च्या खरीप विपणन हंगामात  याच काळात 84.88 लाख मेट्रिक टन तांदुळाची खरेदी झाली होती. आधीच्या हंगामातल्या खरेदीच्या तुलनेत सध्याच्या हंगामातली खरेदी 2.92%. जास्त आहे.

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार,  2020  खरीप विपणन हंगामासाठी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र,तेलंगण, गुजरात,उत्तर प्रदेश, हरियाणा, ओडिशा, राजस्थान   आणि आंध्रप्रदेश या राज्यांसाठी  42.46 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या समर्थन मुल्यानुसार  खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय 1.23  लाख मेट्रिक टन खोबरे खरेदीला आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळसाठी मंजुरी देण्यात आली आहे. 

20.10.2020, पर्यंत सरकारने आपल्या नोडल संस्थाच्या मदतीने तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांकडून .6.02 कोटी रुपये किंमतीच्या मूग आणि उडदाची 819 शेतकऱ्यांकडून खरेदी  केली आहे. त्याचप्रमाणे किमान आधारभूत किंमत 52.40 कोटी रुपये असलेल्या  5089 मेट्रिक टन खोबऱ्याची खरेदी करण्यात आली त्याचा कर्नाटक आणि तामिळनाडू मधल्या 3961 शेतकऱ्यांना लाभ झाला. खोबरे  आणि उडीदाच्या खरेदीबाबत, या पिकांचे उत्पादन होणाऱ्या बहुतांश राज्यात, सध्या बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक आहेत. खरीप हंगामातील डाळी आणि तेलबियांच्या खरेदीबाबत संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेश, निश्चित केलेल्या तारखेपासून खरेदी करण्याची तयारी करत आहेत.

किमान आधारभूत किमतीनुसार पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात कापूस खरेदी सुरळीत सुरु आहे. 20.10.2020 पर्यंत 66,842 लाख रुपये मूल्याच्या 2,36,748 गासड्या कापसाची खरेदी करण्यात आली असून याचा 46,706  शेतकऱ्यांना लाभ झाला.  गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ 2335 गासड्या कापसाची खरेदी करण्यात आली होती.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666473) Visitor Counter : 110