ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान हमीभावाने करण्यात आलेली कृषीमाल खरेदी


गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा धान खरेदी 22.43 टक्क्यांनी अधिक

खरीप डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी निश्चित केलेल्या तारखेपासून खरेदी सुरु करण्यासाठीची व्यवस्था करण्यास प्रारंभ

Posted On: 20 OCT 2020 6:28PM by PIB Mumbai

 

खरीप हंगाम 2020-21 मध्ये  केंद्र सरकारने, गेल्यावर्षी प्रमाणेच शेतकऱ्यांकडून किमान हमीभावाने धान्यखरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड ,चंदिगढ , जम्मू काश्मीर आणि केरळ येथे सध्या धानखरेदी सुरु आहे. या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत, 8.54 लाख शेतकऱ्यांकडून 98.19 लाख मेट्रिक टन धानखरेदी करण्यात आली आहे. धानाचा किमान हमीभाव,प्रती मेट्रिक टन 18880 रुपये असून  त्यानुसार 18539.86 कोटी रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे. गेल्यावराशी याच हंगामात ही खरेदी 80.20 लाख मेट्रिक टन इतकी होती. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत, यंदा धानखरेदीत 22.43% टक्के वाढ झाली आहे.

त्याशिवाय, राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांच्या आधारावर, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांना खरीप विपणन हंगाम 2020 साठी एकूण 42.46 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी करण्याची परवानगी, किंमत समर्थन योजनेअंतर्गत (PSS) देण्यात आली आहे.

तसेच, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांना, 1.23 लाख मेट्रिक टन सुके खोबरे (बारमाही पिक) खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून, PSS अंतर्गत डाळी, तेलबिया आणि सुक्या खोबऱ्याच्या खरेदीविषयी प्रस्ताव आल्यावर, त्यानुसार त्यांना मंजुरी दिली जाईल. जेणेकरुन,जर संबंधित राज्यांत या पिकांचे बाजारभाव किमान हमी भावापेक्षा वर गेले तर, केंद्रीय नोडल एजन्सीमार्फत, राज्यांनी नामनिर्देशित केलेल्या खरेदी संस्थांकडून  या पिकांची खरेदी, किमान हमीभावानुसार थेट  नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून केली जाऊ शकेल.

19 ऑक्टोबर 2020 पर्यंत केंद्र सरकारने आपल्या नोडल संस्थांच्या माध्यमातून 5.80 कोटी रुपये किमतीची 806.11 मेट्रिक टन मूग आणि उडद, किमान हमीभावानुसार खरेदी केली आहे, ज्याचा लाभ तामिळनाडू,महाराष्ट्र आणि हरियाणातील 779 शेतकऱ्यांना झाला आहे. त्याशिवाय, किमान हमीभावानुसार, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील 3961 शेतकऱ्यांकडून, 52.40 कोटी रुपयांच्या 5089 मेट्रिक टन खोबऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. खोबरे आणी उडदच्या खरेदीविषयी सांगायचे झाल्यास, ही उत्पादने असलेल्या बहुतांश राज्यात, सध्या बाजारभाव किमान हमीभावापेक्षा अधिक आहे.

 

खरीप डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी निश्चित केलेल्या तारखेपासून खरेदी सुरु करण्यासाठीची व्यवस्था करण्यास सुरुवात झाली आहे.

पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या उत्तरेकडील राज्यात कापसाची किमान हमीभावानुसार खरेदी सुविहितपणे सुरु आहे. 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत, 40196 शेतकऱ्यांकडून,  56590.51 लाख रुपये किमतीच्या 200512 कापूस गासड्याची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी, याच कालावधीत 1245 कापूस गासड्याची खरेदी करण्यात आली आहे.

****

M.Iyangar/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666161) Visitor Counter : 115