पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणामुळे रेल्वेचे जाळे अधिक वेगवान आणि अधिक विश्वासार्ह कसे बनत आहे यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला एक लेख

Posted On: 23 APR 2026 3:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणामुळे रेल्वेचे जाळे अधिक वेगवान आणि अधिक विश्वासार्ह होण्यासाठी कसे बळ मिळत आहे’ यासंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला.

रेल्वे मार्गांचे नूतनीकरण, प्रगत चाचणी आणि यांत्रिक देखभालीमुळे प्रवासाचा दर्जा सुधारला असून वेगवान प्रवासाची खात्री झाली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. “या बदलांमुळे विलंब कमी होत आहे, प्रवास अधिक सुखकर होत आहे तसेच देशभरातील वाढती प्रवासी आणि मालवाहतुकीची मागणी पूर्ण करण्यास रेल्वेला मदत होत आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले :

“रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणामुळे एक अधिक वेगवान आणि अधिक विश्वासार्ह रेल्वे जाळे तयार होत आहे.

रेल्वे मार्गांचे नूतनीकरण, प्रगत चाचणी आणि यांत्रिक देखभालीमुळे प्रवासाचा दर्जा सुधारला असून वेगवान प्रवासाची खात्री झाली आहे. या बदलांमुळे विलंब कमी होत आहे, प्रवास अधिक सुखकर होत आहे तसेच देशभरातील वाढती प्रवासी आणि मालवाहतुकीची मागणी पूर्ण करण्यास रेल्वेला मदत होत आहे.

केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw यांचा हा लेख अवश्य वाचा.”

indianexpress.com/article/opinio…

via NaMo App

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2254855) अभ्यागत कक्ष : 22