वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-ऑस्ट्रेलिया सीईसीए वाटाघाटींची 11 वी फेरी नवी दिल्लीत संपन्न
Posted On:
23 AUG 2025 6:36PM by PIB Mumbai
भारत-ऑस्ट्रेलिया समावेशक आर्थिक सहकार्य करार (भारत-ऑस्ट्रेलिया सीईसीए) वाटाघाटींची 11 वी फेरी 18 ते 23 ऑगस्ट 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडली. या माध्यमातून द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक भागीदारी मजबूत करण्याचे सामायिक उद्दिष्टाला गती देण्यात आली.
वाटाघाटींच्या मागील फेऱ्यांमध्ये व आंतर-सत्र बैठकींमध्ये झालेल्या प्रगतीच्या आधारे, चर्चेत वस्तू, सेवा व गतिशीलता, डिजिटल व्यापार, उगम नियम, कायदेशीर व संस्थात्मक तरतुदी, पर्यावरण, कामगार आणि लिंग-समानता या विविध विषयांचा समावेश होता, ज्यातून उर्वरित तरतुदींमध्ये एकवाक्यता साधण्यासाठी अधिक सखोल सामंजस्य प्रस्थापित झाले.
दोन्ही पक्षांनी भारत-ऑस्ट्रेलिया सीईसीए ला गती देण्याच्या व त्यातून ठोस लाभ, आर्थिक संधी आणि संतुलित निकाल सुनिश्चित करण्याच्या बांधिलकीला दुजोरा दिला. ही गती कायम ठेवण्यासाठी आणि एकवाक्यता साधण्यासाठी दोन्ही भागीदार आगामी काळात आभासी आंतर-सत्र चर्चांद्वारे संवाद सुरू ठेवतील.
आगामी काळाकडे पाहता, भविष्याभिमुख आराखड्याकडे वाटचाल करण्यासाठी सामायिक महत्त्वाकांक्षा आणि परस्पर सामंजस्याच्या आधारावर भारत आणि ऑस्ट्रेलिया परस्पर हिताचा समावेशक आर्थिक सहकार्य लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. विविध व्यापार करारांद्वारे भारत आपले अस्तित्व विस्तारत असताना, ही फेरी राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि जागतिक आकांक्षा यांना पूरक अशा आर्थिक भागीदारी बळकटीसाठी असलेल्या ठाम बांधिलकीचे प्रतिबिंब दर्शवते.
***
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2160196)
Visitor Counter : 6