वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारताने दावोस मध्ये, लवचिक जागतिक अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीचे पसंतीचे राष्ट्र म्हणून आपले स्थान केले अधिक बळकट

Posted On: 16 JAN 2024 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2024

 


स्वित्झर्लंडच्या दावोस इथे, 15 जानेवारी ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत होत असलेल्या 54 व्या जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्ल्यूईएफ) वार्षिक बैठकीत, ‘'विश्वास संपादन करणे' अशा व्यापक संकल्पनेअंतर्गत, भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.  जागतिक आर्थिक मंचांने निश्चित केलेल्या कार्यप्रवाहात, भारताची दृष्टी प्रतिबिंबित होत आहे- ज्यानुसार, विकास, शून्य कार्बन उत्सर्जन, शाश्वतता, मजबूत अर्थव्यवस्था आणि जी-20 च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, 'वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे ‘संपूर्ण जग एक कुटुंब’ असल्याची आपली संकल्पना, या मंचाच्या कल्पनांशी सुसंगत आहे.  दावोसमधली भारताची उपस्थिती आपल्या देशाचे,  लवचिक जागतिक अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीचे पसंतीचे स्थान अशी प्रतिमा अधिक मजबूत करणारी ठरते आहे.

जागतिक मंचावर प्रतिनिधित्व करणाऱ्या भारत सरकारच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व, महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी करत असून, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी, रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव आर. के. सिंग यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.

जागतिक आर्थिक मंचांवर भारताचा प्रभावी वावर, चार विशेष केंद्रातून दिसते आहे. ती केंद्रे म्हणजे: -

  • इंडिया एंगेजमेंट सेंटर (भारताशी सानिध्य)
  • एक्सपीरियन्स इंडिया सेंटर, (भारताचा अनुभव घ्या)
  • इंडिया इन्व्हेस्टमेंट सेंटर, (भारतात गुंतवणूक केंद्र)
  • वुई लीड लाउंज (आम्ही नेतृत्व करतो)

भारतीय केंद्रांवरील पहिल्या दिवसाची सुरुवात 'सीमेपलीकडेः जागतिक मंचावरील भारताचा प्रभाव: सीमांच्याही पलीकडे "या विषयावरील आकर्षक चर्चासत्राने झाली.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी,  हरदीप सिंग पुरी आणि डीपीआयआयटीचे सचिव आर. के. सिंग यांच्या उपस्थितीत इंडिया एंगेजमेंट सेंटरमध्ये, भारतीय प्रतिनिधी मंडळाची उद्दिष्टे आणि इतर योजनांची माहिती देण्यात आली.

इंडिया लाउंजशी सुसंगत, अशी देशातल्या पाच राज्यांचे लाउंजशी देखील इथे स्थापन करण्यात आली आहेत ज्यातून, भारताची एकत्रित आणि प्रमुख भूमिका अधोरेखित केली जात असून, जागतिक पातळीवर संवाद आणि सहकार्य साधले जात आहे.  या पाच राज्यांमध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1996792) Visitor Counter : 122


Read this release in: English , Urdu , Hindi