भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

75 दिवसांच्या समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमेच्या यशाने 'संपूर्ण सरकार' दृष्टीकोन सिद्ध केला -केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 06 OCT 2022 7:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2022

 

75 दिवसांच्या समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमेच्या यशाने  'संपूर्ण सरकार' दृष्टीकोन सिद्ध केला, असे केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

5 जुलै पासून सुरु झालेली आणि 17 सप्टेंबर रोजी "आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनी' सांगता झालेल्या "स्वच्छ सागर, सुरक्षित सागर" मोहिमेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ जितेंद्र सिंह यांनी, या मोहिमेच्या  भव्य यशासाठी डझनभर केंद्रीय मंत्रालयांचा पाठिंबा अधोरेखित केला.  

भारताला लाभलेला 7500 किमी लांबीचा समुद्रकिनारा भारताच्या @ 2047 च्या दृष्टिकोनाला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल , असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.आणि आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी   आपण आपल्या किमान वापर केलेल्या सागरी संसाधनांचा लाभ घेण्याची  गरज त्यांनी व्यक्त केली. किनारपट्टी स्वच्छतेसाठी वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने  स्थापन केलेला  उच्चस्तरीय चमू  भारताच्या खोल समुद्रातील मोहिमेतही समन्वय साधेल, असे मंत्र्यांनी सांगितले.

भारताच्या 7,500 किमी लांबीच्या किनारपट्टीवर एकाच वेळी किनारी स्वच्छता आणि समुद्र किनारा स्वच्छ करण्याच्या प्रचंड अशा मोठ्या कार्यात भू  विज्ञान मंत्रालयाने बजावलेल्या भूमिकेची  डॉ जितेंद्र सिंह यांनी प्रशंसा केली. राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, चित्रपट कलाकार आणि ख्यातनाम व्यक्तींनी सर्व स्तरातील लाखो स्वयंसेवकांसह समुद्रकिनारा स्वच्छतेच्या उपक्रमात भाग घेतला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 9 किनारी राज्यांतील 45 हून अधिक उपायुक्त/जिल्हाधिकाऱ्यांनी ही  मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865676) Visitor Counter : 192