वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आयआयटी दिल्ली येथे पीएसएल अर्थात सार्वजनिक यंत्रणा प्रयोगशाळेचे उद्‌घाटन


पीएसएल हे अभिनव संशोधनाचे उत्कृष्ट उदाहरण असून आपल्या देशाचा विकास घडविणे तसेच देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ते मोठे योगदान देईल

Posted On: 16 AUG 2022 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2022

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात आपल्या देशाला विकसित देश म्हणून घडविण्यावर भर दिला आणि विकसित देश होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून ‘जय अनुसंधान’ अर्थात ‘जय अणुसंशोधन’ अशी हाक देशवासियांना दिली. पंतप्रधानांच्या ‘जय अनुसंधान’ या हाकेचा संदर्भ देत, केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, या दिशेने मार्गक्रमण करताना अमृत काळात प्रवेश करण्याच्या पहिल्याच दिवशी सार्वजनिक यंत्रणा प्रयोगशाळेचे उद्घाटन होणे, यापेक्षा उत्तम मार्ग असूच शकत नाही. नवी दिल्ली येथील आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेत सार्वजनिक यंत्रणा प्रयोगशाळेचे करताना ते बोलत होते.

सार्वजनिक यंत्रणा प्रयोगशाळा विविध पद्धतींनी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.सार्वजनिक अन्नधान्य खरेदी तसेच वितरण या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये हे अभिनव संशोधन मोठे योगदान देऊ शकते. आपल्या देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक कार्यक्षमता निर्माण करून देशाला भ्रष्टाचार मुक्त करणाऱ्या अभिनव संशोधनाचे सार्वजनिक यंत्रणा प्रयोगशाळा हे फार उत्कृष्ट उदाहरण आहे. असे पीयूष गोयल यावेळी म्हणाले.

अभिनव संशोधनाच्या बाबतीत तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक परिणामकारक आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी नवोन्मेषी उपाययोजना करण्याच्या बाबतीत सरकारच्या आग्रही भूमिकेबद्दल बोलताना, गोयल म्हणाले, महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, भारत अन्नसुरक्षेच्या समस्येचा सामना करण्यासाठी पीएमजीकेएवायसारख्या सरकारी उपक्रमांच्या माध्यमातून जगासमोर एक आदर्श नमुना उभा करत आहे. महाभयंकर महामारी असताना देखील केंद्र सरकारने एक देश, एक शिधापत्रिका उपक्रमाच्या मदतीने सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली आहे.

सार्वजनिक यंत्रणा प्रयोगशाळेची उभारणी केल्याबद्दल आयआयटी दिल्ली आणि जागतिक खाद्य कार्यक्रम यांची प्रशंसा करून केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की येथे होत असलेल्या  संशोधन कार्यातून, सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक परिणामकारक तसेच अधिक कार्यक्षम करण्यासाठी भारताने केलेल्या तंत्रज्ञान तसेच अभिनव संशोधनाच्या वापराचे दर्शन जगाला घडेल.

देशातील युवकांना विकसित तसेच समृध्द भारत घडविण्यात योगदान देण्याचे आवाहन करून केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, जगभरात आज, उदयोन्मुख महासत्ता, स्टार्ट-अप उद्योगांचा देश, नवोन्मेषी संशोधकांचा देश, वेळेआधीच शाश्वत विकास ध्येये साध्य करून दाखविणारा देश म्हणून भारताची चर्चा होते आहे. जेव्हा भारताच्या विकासात योगदान देणाऱ्या अभिनव संकल्पना घेऊन तरुण पिढी पुढे सरसावते तेव्हाच हे शक्य होते.

 

R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1852337) Visitor Counter : 152