गृह मंत्रालय

1947 मध्ये फाळणीचा फटका सहन केलेल्या लाखो लोकांना फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी केले नमन


1947 मध्ये झालेली देशाची फाळणी हा भारतीय इतिहासाचा अमानुष अध्याय आहे जो कधीही विसरता येणार नाही- अमित शाह

फाळणीतील हिंसाचार आणि द्वेषभावनेने लाखो लोकांचा बळी घेतला आणि असंख्य लोक विस्थापित झाले

आज फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, फाळणीचा फटका सहन करणाऱ्या लाखो लोकांना मी नमन करतो-अमित शाह

हा दिवस तरुण पिढीला फाळणीच्या वेळी लोकांनी सहन केलेल्या यातना आणि वेदनांची आठवण करून देईल आणि देशवासियांना देशात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी प्रेरणा देत राहील.

Posted On: 14 AUG 2022 12:37PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, 1947 मध्ये फाळणीचा फटका सहन करणाऱ्या लाखो लोकांना नमन केले आहे. अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 1947 मध्ये देशाची फाळणी झाली.  हा भारतीय इतिहासाचा तो अमानवी अध्याय आहे जो कधीही विसरता येणार नाही.  फाळणीच्या हिंसाचार आणि द्वेषाने लाखो लोकांचा बळी घेतला आणि असंख्य लोक विस्थापित झाले.  आज फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, फाळणीचा फटका सहन करणाऱ्या लाखो लोकांना मी नमन करतो.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, "फाळणी वेदना स्मृती दिनामुळे देशातील तरुण पिढीला फाळणीच्या वेळी लोकांनी भोगलेल्या यातना आणि वेदनांची आठवण करून दिली जाईल आणि ही घटना देशामध्ये सदैव शांतता आणि सलोखा राखण्यासाठी देशवासियांना प्रेरणा देत राहील."

***

S.Thakur/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851896) Visitor Counter : 192