ग्रामीण विकास मंत्रालय

अमृत सरोवर अभियान

Posted On: 02 AUG 2022 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा एक भाग म्हणून, भविष्यासाठी पाणी वाचवण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय पंचायती राज दिनी  24 एप्रिल 2022 रोजी अमृत सरोवर अभियान सुरु करण्यात आले. देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 जलस्रोतांचा विकास आणि पुनरुज्जीवन करण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. आसाम आणि राजस्थान राज्यांसह सर्व राज्ये या अभियानाअंतर्गत समाविष्ट आहेत. या अनुषंगाने 29 जुलै 2022 पर्यंत, 80,034 ठिकाणे निश्चित करण्यात आली  आहेत आणि 35, 364 ठिकाणांवर काम सुरू झाले आहे. 4,753 ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. यासंदर्भातील अधिक तपशील https://water.ncog.gov.in/AmritSarovar/ वर उपलब्ध आहे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंधरावा  वित्त आयोग अनुदान यासह पाणलोट विकास घटक, प्रत्येक शेतीला पाणी यांसारख्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या  (पीएमकेएसवाय) उपयोजना, याशिवाय राज्यांच्या स्वतःच्या योजना यांसारख्या विविध योजनांवर पुन्हा लक्ष केंद्रित करून, राज्ये आणि जिल्ह्यांच्या माध्यमातून या अभियानाअंतर्गत काम केले जाते.  या प्रयत्नांना पूरक म्हणून नागरिक आणि बिगर-सरकारी संसाधनांना  एकत्रित कार्य करण्यासाठी हे अभियान  प्रोत्साहित करते.

केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847622) Visitor Counter : 117


Read this release in: English , Urdu , Manipuri