ग्रामीण विकास मंत्रालय
अर्थसंकल्प 2021-22: प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या पाणलोट विकास घटकाची स्थिती
Posted On:
08 FEB 2021 9:36PM by PIB Mumbai
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, महिला सशक्तीकरण आणि सर्वसमावेशक विकास (परिच्छेद 25) यांचा उल्लेख केला. -जे ग्रामविकास मंत्रालयाच्या भूमि संसाधन विभागाच्या पीएमकेएसवायच्या पाणलोट विकास घटकांअंतर्गत येतात.
2015-16 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (पीएमकेएसवाय) चा पाणलोट विकास घटक (डब्ल्यूडीसी) म्हणून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचे (आयडब्ल्यूएमपी) विलीनीकरण करण्यात आले. डब्ल्यूडीसी-पीएमकेएसवाय हे पर्जन्यवृष्टी आणि उत्पादनक्षम नसलेल्या क्षेत्राच्या विकासासाठी आहे. 8214 मंजूर पाणलोट विकास प्रकल्पांपैकी 345 प्रकल्प अद्याप सुरु झालेले नाहीत आणि 1487 प्रकल्प तयार होण्याच्या (एकूण 1832) टप्प्यात असून त्या-त्या राज्यांच्या अर्थसंकल्पांतर्गत घेण्यासाठी राज्यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत.
राज्यांकडून प्राप्त माहितीनुसार, 2014-15, पासून, 7.09 लाख पाणी साठवणुकीची संरचना निर्माण करण्यात आली आणि 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीत 15.17 लाख हेक्टर क्षेत्राला संरक्षक सिंचनाखाली आणले गेले. उर्वरित प्रकल्पांपैकी 6382 प्रकल्पाना जमीन संसाधन विभागाकडून वित्त पुरवठा केला जात आहे आणि 31.01.2021,पर्यंत 4743 (74.32%) पूर्ण झाले आहेत. 409 (6.41%) एकत्रीकरण टप्प्यात आहेत तर 1230 (19.28%) प्रकल्पांचे काम सुरु आहे.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696341)
Visitor Counter : 179