रेल्वे मंत्रालय
'रेक पॉईंट्स'चे आधुनिनिकीकरण आणि प्रारंभ
Posted On:
23 SEP 2020 6:03PM by PIB Mumbai
देशात सध्या अस्तित्वात असलेल्या रेक पॉईंट्सचे आधुनिकीकरण आणि नव्या रेक पॉइंट्सचा प्रारंभ ही गरजेनुसार निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. व्यापारीदृष्ट्या औचित्य, कार्यान्वित राहण्याच्या दृष्टीने आवश्यकता, तांत्रिक व्यवहार्यता आणि संसाधनांची उपलब्धता यानुसार ही प्रक्रिया सुरु राहते. रेक पॉईंटच्या सुधारणेच्या 60 कामांना मंजुरी मिळाली असून, यासाठी 1,975 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या 60 कामांपैकी 31 कामे पूर्ण झाली असून इतर कामे, पूर्ततेच्या निरनिराळ्या टप्प्यांवर आहेत.
खते आणि उर्वरकांच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या गाड्या आरक्षित करण्यावर संख्येच्या बाबतीत कोणतीही मर्यादा नाही. भारतभरातील विविध ठिकाणी खते व उर्वरके वाहून नेण्यासाठी रेल्वेकडे पुरेशा गाड्या उपलब्ध आहेत. 1 एप्रिल 2020 ते 15 सप्टेंबर 2020 या काळात भारतीय रेल्वेने 24.26 दशलक्ष टन वजनाच्या खते व उर्वरकांची वाहतूक केली. 1 एप्रिल 2019 ते 15 सप्टेंबर 2019 या काळात हाच आकडा 22.58 दशलक्ष टन इतका होता. त्यामध्ये 7.44% इतकी वाढ नोंदवली गेली.
रेल्वे आणि वाणिज्य तथा उद्योग मंत्री श्री.पियुष गोयल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादरम्यान ही माहिती दिली.
M.Chopade/J.Waishyampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658238)
Visitor Counter : 63