महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बालविकास मंत्रालयाला ‘पीएम जनमन’ अंमलबजावणीतील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार
भारताच्या राष्ट्रपतींकडून मंत्रालयाचा गौरव
Posted On:
19 OCT 2025 4:46PM by PIB Mumbai
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (पीएम जनमन) या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल महिला आणि बालविकास मंत्रालयाला विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडून मंत्रालयाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. हा सन्मान नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित ‘आदि कर्मयोगी अभियान’ राष्ट्रीय संमेलनादरम्यान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी व्यवहार मंत्रालयाने केले होते.
पीएम जनमन योजनेअंतर्गत विशेषतः असुरक्षित आदिवासी गट (पीव्हीटीजी) क्षेत्रांमध्ये 2000 हून अधिक अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, ज्यामुळे अंतिम टप्प्यावरील आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणास चालना मिळाली आहे.
या सन्मानाद्वारे महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या ‘विकसित भारत 2047’ या दृष्टीकोनाशी सुसंगत प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे.

***
शैलेश पाटील / गजेंद्र देवडा / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2180908)
Visitor Counter : 8