विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या “अटल टिंकरिंग प्रयोगशाळा ” शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या ठरल्या आहेत - केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
05 DEC 2023 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या "अटल टिंकरिंग लॅब्स" शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या ठरल्या आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे म्हटले आहे.
“अटल टिंकरिंग लॅब, अटल इनक्युबेशन सेंटर आणि अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स स्टार्टअप्स आणि नवोन्मेषाला समर्थन देण्यासोबतच शालेय मुलांमध्ये नवोन्मेषी मानसिकता विकसित करत आहेत", असे नवी दिल्लीतील एनडीसीसी कन्व्हेन्शन सेंटर येथे दिल्ली नगरपरिषदेच्या (NDMC) शाळांच्या वार्षिक विज्ञान मेळ्याचे उद्घाटन करताना डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
5UGL.jpg)
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि अटल टिंकरिंग लॅब्स (ATLs) च्या मार्गदर्शन कार्यक्रमांचा संदर्भ देत, या सर्वांना “कॅच देम यंग” या मंत्राने मार्गदर्शन केले जात आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
नुकतेच आपले 7 वे वर्ष पूर्ण करणारे अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सरकारच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या संकल्पनेला पूरक आहे, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
O0DZ.jpg)
विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोन्मेषांसह युवा भारताच्या भविष्यातील विकासाला चालना देतील, असे डॉ.सिंह म्हणाले. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये भारताच्या वैज्ञानिक कौशल्याचा मोठा वाटा असेल, असे ते म्हणाले.
जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोपक्रम हे जर एकमेकांच्या हातात हात घालून चालत असतील तसेच उत्तम वैज्ञानिक मानसिकता यासोबतच उत्तम संशोधन आणि विकास रचना असलेला देश नवोन्मेष आणि नवउद्योजकतेमध्ये सर्वोउत्कृष्ट ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
देशभरात 10,000 अटल टिंकरिंग लॅब्स असून, त्यात 75 लाख विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होत आहेत. अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत, 59 अटल इनक्युबेशन सेंटर्सनी 32,000 हून अधिक रोजगार निर्मिती केली आणि 2,900 हून अधिक स्टार्टअप्सना समर्थन दिले आहे.
IT8C.jpg)
2047 मध्ये,जेव्हा भारत स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करत असेल तोपर्यंत भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवण्यात योगदान देण्यासाठी अमृत काळामध्ये युवा नवोन्मेषक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील,असा विश्वास डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.
7NEZ.jpg)
येत्या काही वर्षांत 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करण्यात भारतातील नवोन्मेषी उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा डॉ. सिंह यांनी व्यक्त केली.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1982906)