अर्थ मंत्रालय

2018-19 पासून तीन वर्षांत डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणात 88% वाढ

Posted On: 21 DEC 2021 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2021

 

सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरादरम्यान ही माहिती दिली.

'गेल्या तीन वित्तीय वर्षांतील डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणातली वाढ बघता हा बदल त्यात प्रतिबिंबित झाल्याचे दिसून येते', असे सांगून डॉ.कराड यांनी त्याविषयी पुढीलप्रमाणे माहिती दिली-

Financial Year

Volume (in lakhs)

2018-19

2,32,602

2019-20

3,40,025

2020-21

4,37,445

Source: RBI

वरील सारणीनुसार, गेल्या तीन वर्षांत 2018-19 पासून डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणात 88% वाढ झाली असल्याचे मंत्रिमहोदयांनी सांगितले.

डिजिटल व्यवहार मंच हा एक अखिल भारतीय मंच असून, 'कधीही, कोठेही' बँक सुविधा वापरण्याची सोय त्यामध्ये दिलेली असते. त्याप्रमाणे, केवळ राष्ट्रीय पातळीवरच माहिती गोळा केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने, प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पैसे देण्यासाठीचा भारताचा स्वतःचा मंच- यूपीआय - याला डिजिटल पेमेंटसाठी आवडता मंच म्हणून देशाने पसंती दिली आहे. वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये 22 अब्जापेक्षा अधिक व्यवहार या मंचावर नोंदले गेले. गेल्या तीन वर्षांमध्ये यूपीआयने चौपट वाढ दर्शवली आहे. शिवाय, वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये AePS (म्हणजे 'आधार'वर अवलंबित पेमेंट प्रणाली) आंतर-बँक व्यवहारांमध्ये गेल्या चार वर्षांच्या तुलनेत नऊ पटींनी वाढ झाली आहे, अशी माहिती डॉ.कराड यांनी दिली.


* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1784013) Visitor Counter : 194


Read this release in: Urdu , English