ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खरीप विपणन हंगाम 2020-21 दरम्यान किमान हमीभावाने सुरु असलेली धान्यखरेदी

Posted On: 26 JAN 2021 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जानेवारी 2021


खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून किमान हमीभावाने धान्यखरेदी करत आहे.

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये धानाची खरेदी सातत्याने होत आहे. पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंडीगड, जम्मू-काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, आसाम, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 25 जानेवारी 2021 पर्यंत 587.57 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त तांदळाची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळातील 488.49 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदीमध्ये यावर्षी 20.28% वृद्धी झाली आहे. 587.57 लाख मेट्रिक टन एकूण खरेदीपैकी केवळ पंजाबने 202.77 लाख मेट्रिक टन धान खरेदी केले असून ते एकूण खरेदीच्या 34.51 टक्के आहे.

आतापर्यंत 1,10,934.02 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली असून 84.71 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे.

 

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावाच्या आधारे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम 2020 च्या डाळी आणि तेलबियांच्या 51.92 लाख मेट्रिक टन एवढ्या खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यांसाठी सुक्या खोबऱ्याच्या (बारमाही पीक) 1.23 लाख मेट्रिक टन खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. पुढे, संबंधित राज्य सरकारच्या आधारे गुजरात आणि तामिळनाडू राज्यांसाठी रबी विपणन हंगाम 2020-2021  च्या डाळी व तेलबिया यांच्या 2.50 एलएमटी खरेदीसंदर्भातील प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आले. अन्य राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांकडून  पीएसएस अंतर्गत डाळी, तेलबिया आणि सुक्या खोबऱ्याच्या खरेदीचा प्रस्ताव मिळाल्यानंतर त्यांना परवानगी दिली जाईल. जर केंद्रिय मध्यवर्ती एजन्सीकडून जाहीर झालेल्या आणि राज्य सरकारने नामनिर्देशित केलेल्या एजन्सीमार्फत दिल्या जाणाऱ्या खरेदी दरापेक्षा बाजारातील  किमती कमी झाल्या तर एफएक्यू ग्रेडच्या पिकांची खरेदी थेट नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून सन 2020–21 साठी अधिसूचित खरेदी किमान आधारभूत किंमतीनुसार  करता येईल.

25 जानेवारी 2021 पर्यंत, नोडल संस्थेच्या माध्यमातून सरकारने  3,01,124.83 मेट्रिक टन मूग, उडीद, तूर, शेंगदाणे आणि सोयाबीन खरेदी केला आहे, किमान आधारभूत किंमतीनुसार  1,622.29 कोटी रुपये मूल्य  खरेदीचा लाभ तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, राजस्थान मधील 1,62,120 शेतकऱ्यांना झाला आहे.

त्याचप्रमाणे, 5,089 मेट्रिक टन सुके खोबरे (बारमाही पीक) खरेदी करण्यात आले आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू मधील 3,961  शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे.  सुके खोबरे आणि उडद डाळीच्या संदर्भात या पिकांसाठी मोठ्या उत्पादक राज्यांमध्ये बहुतेक वेळा एमएसपीपेक्षा जास्त पैसे दिले जाजातात. खरीप डाळी व तेलबियांच्या आवकनुसार संबंधित राज्यसरकार, केंद्रशासित प्रदेश  त्यानुसार  खरेदी सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करीत आहेत.

  

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओदिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कापसाची खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. 25 जानेवारी 2021 पर्यंत 25825.34 कोटी रुपये किमतीच्या 88,43,412 गासड्या कापूस  खरेदी करण्यात आला  आहे आणि त्याचा फायदा 18,13,288 शेतकऱ्यांना झाला आहे.


* * *

Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1692548) Visitor Counter : 115