ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खरीप विपणन हंगाम 2020-21 दरम्यान किमान हमीभावाने सुरु असलेली धान्यखरेदी

Posted On: 12 JAN 2021 11:10PM by PIB Mumbai

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून किमान हमीभावाने धान्यखरेदी करत आहे.

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये धानाची खरेदी सातत्याने होत आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून तांदळाची आवक होत आहे. यामध्ये महाराष्ट्रासह, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदिगड, जम्मू आणि काश्मिर, केरळ आणि गुजरात आणि आंध्र प्रदेश,छत्तीसगढ, ओडिशा, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, आसाम, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये दि. 11.01. 2021 पर्यंत 541.11 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त तांदळाची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळापर्यंत 429.20 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी झाला होता. यंदा तांदळाच्या खरेदीमध्ये 26.07 % टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एकूण 541.11 लाख मेट्रिक टन तांदूळ-धान खरेदीपैकी एकट्या पंजाबमध्ये 202.77 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी झाला आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण खरेदीपैकी 37.47टक्के आहे.

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान हमीभावानुसार धान्यखरेदी होत असून आत्तापर्यंत 72.46 लाख शेतक-यांना त्याचा लाभ झाला आहे. या धान्य खरेदीपोटी 102161.76 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

त्याशिवाय, राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांच्या आधारे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राज्यस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम-2020 मध्ये 51.66 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी मूल्य समर्थन योजनेनुसार (पीएसएस) करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच 1.23 लाख मेट्रिक टन खोबरे खरेदी करण्यात येणार आहे. ही खरेदी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि केरळ यांच्या मागणीनुसार करण्यात येणार आहे. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जर अन्नधान्य मागणीचे प्रस्ताव पाठविले तर ते त्वरित मान्य करून त्यांच्यासाठीही डाळी, तेलबिया आणि खोबरे यांची खरेदी मूल्य समर्थन योजनेनुसार करण्यात येणार आहे. या पिकांच्या एफएक्यू ग्रेडची खरेदी थेट नोंदणीकृत शेतकरी बांधवांकडून 2020-21च्या अधिसूचित किमान आधारभूत मूल्यानुसार  नियोजित हंगामामध्ये करण्यात येणार आहे. तसेच तिथे जर अन्नधान्याच्या किंमती किमान आधारभूत मूल्यांपेक्षा कमी झाल्या तर राज्यांनी निर्धारित केलेल्या संस्थांच्या माध्यमातून केंद्रीय नोडल संस्थांकडून नोंदणीकृत शेतक-यांच्या पिकांची खरेदी करण्यात येणार आहे.

11 जानेवारी 2021 पर्यंत सरकारने नोडल  संस्थांच्यामार्फत 288457.68 मेट्रिक टन मूग आणि उडीद, भूईमुगाच्या शेंगा आणि सोयाबीन यांची किमान हमीभावानुसार खरेदी केली. त्याचे एकूण मूल्य 1543.27 कोटी रूपये इतके आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि राजस्थान मधल्या 153439 शेतकर्यांना याचा लाभ झाला.

या खरीप हंगामात 11 जानेवारीपर्यंत कापूस महामंडळाने 1617979 शेतकऱ्यांकडून 8341536 गासड्या कापूस खरेदी केला आहे. यासाठी किमान हमीभावानुसार, 24399.63  कोटी रूपये देण्यात आले. ही खरेदी महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातून सुरळीत  सुरू आहे.

***

Jaydevi P.S/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688092) Visitor Counter : 75