ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खरीप विपणन हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमतीवर खरेदी


एकूण 66135.01 कोटी रुपयांच्या आधारभूत किंमतीवरील खरेदीचा साधारणतः 36.13 लाख तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना लाभ

Posted On: 08 DEC 2020 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020

 

सध्या सुरू झालेल्या खरीप विपणन हंगाम (KMS) 2020-21, मध्ये सरकार गेल्या हंगामाप्रमाणेच अस्तित्वात असलेल्या किमान आधारभूत किंमत योजनांनुसार शेतकऱ्यांकडून खरीप पिकांची खरेदी करत आहे.

खरीप 2020-21 मधील खरीप हंगामातील धान(तांदूळ) खरेदी, तांदूळ उत्पादक राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये  सुरळीत सुरू आहे.  पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदीगढ, जम्मू-काश्मीर, केरळ, गुजराथ, आणि आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़, ओदिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व बिहार या राज्यांमध्ये 07.12.2020 पर्यंत 350.29 लाख मेट्रीक टन धान खरेदी झाले. गतवर्षी याच काळात 292.37  लाख मेट्रीक टन धान खरेदी झाले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी धान खरेदीत  19.81 % नी वाढ झाली.

फक्त पंजाबमध्ये खरिप विपणन हंगामात  30.11.2020 पर्यंत 202.77 लाख मेट्रीक टन धान खरेदी केले गेले. हे प्रमाण देशातील एकूण खरेदीच्या 57.88 % आहे.

चालू खरीप विपणन हंगामातील किमान आधारभूत किमतीवरील एकूण 66135.01 कोटी रुपयांच्या खरेदीचा लाभ 36.13 लाख शेतकऱ्यांना झाला.

राज्यांकडून मिळालेल्या प्रस्तावाच्या आधारे मूल्य समर्थन योजनेंतर्गत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, ओदिशा, राजस्थान , आंध्र प्रदेश या राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम 2020  च्या 48.11  लाख मेट्रिक टन डाळी व तेलबिया मूल्य समर्थन योजनेंतर्गत खरेदीला मान्यता देण्यात आली. इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून मूल्य समर्थन योजनेंतर्गत अंतर्गत डाळी, तेलबिया आणि खोबरे खरेदीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर मान्यताही देण्यात येईल जेणेकरून या पिकांच्या एफएक्यू ग्रेडची खरेदी  2020-21 वर्षासाठी अधिसूचित  किमान आधारभूत किमतीनुसार संबधित राज्यांकडून करता येईल. अधिसूचित कापणीच्या कालावधीत बाजार दर हे किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी असले तर या राज्यांमध्ये केंद्रीय नोडल संस्थांकडून  राज्य नामांकित खरेदी एजन्सीमार्फत खरेदी केली जाईल.

07.12.2020  पर्यंत सरकारने आपल्या नोडल एजन्सीमार्फत मूग ,उडीद, भुईमूग शेंगा आणि  सोयाबिनची 139458.85 मे.टनाची 749.85 कोटी रुपये एमएसपी मूल्याची  खरेदी केली असून तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजराथ हरियाणा आणि राजस्थानमधील 79201 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

त्याचप्रमाणे 07.12.2020 पर्यंत 5089 मे. टन खोबरे (बारमाही पीक) चे एमएसपी मूल्याने 52.40 कोटी रुपयांची खरेदी झाली असून त्याचा कर्नाटक आणि तामिळनाडूमधील 3961 शेतकऱ्यांना  फायदा झाला आहे. गतवर्षी 293.34 MT खोबरे खरेदी झाली होती. खोबरे आणि उडदाच्या  संदर्भात बहुतांश प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये दर एमएसपीपेक्षा अधिक आहे. खरीप डाळी व तेलबियांच्या आवकानुसार संबंधित राज्यांनी ठरविलेल्या तारखेपासून  संबंधित राज्य/ केंद्रशासित प्रदेश सरकार  खरेदी सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करत आहेत.

पंजाब, हरियाणा, राजस्थान मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओदिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये किमान आधारभूत किमतीने कापूस खरेदी सुरळीत सुरू आहे. 07.12.2020 पर्यंत 12,000.95 कोटी रुपये किमतीच्या 4101018 कापसाच्या गासड्या खरेदी झाल्या असून त्याचा लाभ 7,96,726 शेतकऱ्यांना झाला.

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1679209) Visitor Counter : 128