अर्थ मंत्रालय
सब का विश्वास- प्रलंबित वाद निराकरण योजना
Posted On:
10 FEB 2020 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2020
सब का विश्वास प्रलंबित वाद निराकरण योजना 2019 अंतर्गत 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत 24,970 कोटी रुपयांच्या 49,534 प्रकरणांमध्ये तोडगा निघाला आहे.
वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार खात्याचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सेवा कर आणि केंद्रीय अबकारी करांतर्गत 31 डिसेंबर 2019 पर्यंत विविध न्यायालयांमध्ये 415172.83 कोटी रुपयांची 1,44,556 प्रकरणे दाखल आहेत.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1602708)
Visitor Counter : 112