उपराष्ट्रपती कार्यालय
चेन्नईमधल्या वेल टेक विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींचे संबोधन
Posted On:
13 MAR 2019 6:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2019
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज चेन्नईमधल्या वेल टेक विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. संधीचा लाभ घेऊन नाविन्यता आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा हा काळ असल्याचे उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. नाविन्यता आणि उद्योजकता ही समृद्ध भारताची दुहेरी इंजिनं असून संशोधनावर आधारित शिक्षण देणे व घेणे प्रक्रिया व्हायला हवी असे उपराष्ट्रपती म्हणाले. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी शिक्षणसंस्था आणि उद्योगक्षेत्रात दृढ संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने शिक्षण पद्धतीला नवे रुप द्यायला हवे असे ते म्हणाले.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1568769)
Visitor Counter : 141