मंत्रिमंडळ
जम्मू काश्मीर मधल्या दुर्बल घटकातल्या ग्रामीण कुटुंबाना प्रोत्साहन
Posted On:
19 SEP 2018 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2018
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी जम्मू-काश्मीर मधे 2018-19 मधे आणखी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
जम्मू काश्मीरसाठी या योजने अंतर्गत विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी दारिद्रय रेषेशी न जोडता गरजेनुसार निधी मंजूर करण्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे कोणताही अतिरिक्त वित्तीय बोजा पडणार नाही. 2018-19 या वर्षासाठी 143.604 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.
प्रभाव :-
यामुळे राज्यातल्या सर्व दुर्बल घटकातल्या ग्रामीण कुटुंबाना म्हणजे सुमारे दोन तृतीयांश कुटुंबाना विहित कालावधीत या अंतर्गत आणता येणार आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत जम्मू काश्मीरमधल्या सर्व विभागाचा समावेश होऊन सामाजिक समावेशकता,उपजीविकेसाठी प्रोत्साहन मिळून राज्यात दारिद्रय निर्मूलनाला मदत होणार आहे.
पूर्वपीठीका :-
काही अपरिहार्य कारणांमुळे आणि अशांत स्थितीमुळे राज्यात मे 2013 मधे मंजूर झालेले विशेष पॅकेज पूर्णतः लागू करण्यात आले नव्हते.
N.Sapre/ N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1546675)
Visitor Counter : 57