पंतप्रधान कार्यालय
गेल्या सहा महिन्यात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे 130 कोटी भारतीयांचे सबलीकरण-पंतप्रधान
Posted On:
30 NOV 2019 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2019
गेल्या सहा महिन्यात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे 130 कोटी भारतीयांचे सबलीकरण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या उद्दिष्टाने प्रेरित होऊन आणि 130 कोटी भारतीयांच्या आशीर्वादाने, भारताच्या विकासासाठी आणि 130 कोटी भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार नव्या जोमाने काम करत आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
गेल्या सहा महिन्यात सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे विकासाला, सामाजिक सबलीकरणाला चालना आणि प्रगत नव भारताच्या निर्मितीसाठी येत्या काळात असे अधिकाधिक निर्णय घेणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1594569)
अभ्यागत कक्ष : 127