अर्थ मंत्रालय
सरकारी आणि पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेवर आधारित अखिल भारतीय प्रश्नमंजुषा 2023ची राष्ट्रीय अंतिम फेरी मुंबईत संपन्न
Posted On:
14 SEP 2023 5:35PM by PIB Mumbai
मुंबई, 14 सप्टेंबर 2023
समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी रिझर्व्ह बँक वेळोवेळी विविध उपक्रम हाती घेत असते. मुलांसाठी एक अनोखा उपक्रम म्हणून,भारतीय रिझर्व्ह बँकेने देशभरातील सरकारी आणि पालिका शाळांमधील आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेवर आधारित अखिल भारतीय प्रश्नमंजुषा आयोजित केली होती.
बहु-स्तरीय प्रश्नमंजुषा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तालुका स्तरावर सुरू झाली आणि त्यातील विजेत्या संघांनी जिल्हा आणि राज्य स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला. राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या संघांनी वेगवेगळ्या तारखांना चंदीगड, हैदराबाद, नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुवाहाटी येथे झालेल्या सहा विभागीय फेरीत सहभाग घेतला. प्रश्नमंजुषेची राष्ट्रीय अंतिम फेरी आज, 14 सप्टेंबर 202 रोजी मुंबई येथे झाली. विभागीय फेरीतील विजेते अंतिम फेरीत सहभागी झाले होते. नवी दिल्ली येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्समधील अमन गुप्ता आणि उत्कर्ष सुधाकर विजेते ठरले. कार्यकारी संचालक रोहित जैन आणि नीरज निगम यांनी विजेत्या व सहभागी संघांना सन्मानित केले. या प्रश्नमंजुषेमध्ये देशभरातील 51,694 शाळांमधील 1,03,388 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आर्थिक साक्षरता/जागरूकता या क्षेत्रातील सरकारी आणि पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये यामुळे प्रचंड उत्साह निर्माण झाला.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1957386)
Visitor Counter : 91