संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विजय मशाल पोहचली 1971 च्या युद्धातील शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या भेटीला

प्रविष्टि तिथि: 05 SEP 2021 7:01PM by PIB Mumbai

 

01 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झालेल्या स्वर्णिम विजय वर्ष मशालीने 04 सप्टेंबर 21 रोजी मुंबईत राहणाऱ्या शौर्य पुरस्कार विजेत्यांना भेट दिली.

वीर चक्र पुरस्कार विजेते कमोडोर इंद्रजीत सिंह (निवृत्त), कमांडर अशोक कुमार (निवृत्त) आणि विंग कमांडर बी बी सोनी (निवृत्त) यांनी एका समारंभात  या विजय मशालीचे स्वागत केलेयुद्धात सहभागी झालेल्या  निवृत्त सैनिकांच्या  कुटुंबातील सदस्य आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे अधिकारी या समारंभाला उपस्थित होते.

डॉ. भारती लव्हेकर  (वर्सोवा) आणि श्री.अमीत श्याम साटम (अंधेरी पश्चिम).या आमदारांच्या उपस्थितीत , तिन्ही  सशस्त्र दलांच्या  वतीने महाराष्ट्राचे प्रभारी नौदल अधिकारी कमोडोर संजय सचदेव यांनी  शौर्य पुरस्कार विजेत्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.

उपस्थित सर्वांनी 'भारत माता की जय' असा  जयघोष करत हा सोहळा संपन्न झाला, हे 1971 च्या युद्धात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जोशपूर्ण  आणि लढाऊ वृत्तीचे खरे प्रतिबिंब होते.

***

S.Thakur/S.Chavan/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1752364) आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English