ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

121.71 लाख मेट्रीक टन गव्हाची खरेदी, सुमारे 11,59,816 शेतकऱ्यांना लाभ.


गेल्यावर्षीच्या 629.66 लाख मेट्रिक टनाच्या तुलनेत यंदा 704.35 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी ( खरीप आणि रब्बी पिकांचाही समावेश)

सरकारने नोडल एजन्सीच्या माध्यमातून

5,74,125.54 मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची केली खरेदी.

Posted On: 19 APR 2021 6:22PM by PIB Mumbai

मागील हंगामाप्रमाणेच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि गुजरात या राज्यांमध्ये रब्बी विपणन हंगाम RMS2021-22 मध्ये गव्हाची हमीभावाने खरेदी नुकतीच सुरू झाली आहे . आतापर्यंत (18.04.2021) 121.71 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली असून सुमारे 11,59,816 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. याचे 24037.56 कोटी रुपये हमी भाव मूल्य आहे.

 

चालू खरीप हंगाम 2020-21 मधे धानाची खरेदी संबंधित राज्यांमधे सुरळीत चालू आहे. आतापर्यंत 704.35 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी झाली असून (खरीप पीक 701.27 लाख मेट्रिक टन आणि रब्बी पीक 3.08 लाख मेट्रिक टन याचा यात समावेश आहे). गेल्या वर्षीच्या 629.66 लाख मेट्रिक टन च्या तुलनेत 18.04.2021 पर्यंत ही खरेदी झाली आहे. 105.46 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना चालू खरीप विपनन हंगामातल्या या खरेदीचा 1,32,981.20 कोटी रुपये हमीभाव मूल्याचा लाभ झाला आहे.

 

   

या शिवाय राज्यांकडून आलेल्या प्रस्तावाच्या आधारे तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या सारख्या राज्यांमधून खरीप विपणन हंगाम 2020-21 आणि रब्बी विपणन हंगाम 2021 करता मूल्य समर्थन योजना (पीएसएस) अंतर्गत 107.08 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबिया खरेदीला मंजूरी देण्यात आली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ राज्यांतून 1.23 लाख मेट्रिक टन खोबरे (बारमाही पीक)) याच्या खरेदीलाही मंजूरी देण्यात आली. अधिसूचीत पीकाच्या काळात, संबंधित राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधे बाजारभाव, एमएसपी पेक्षा कमी झाल्यास राज्यांमधल्या मान्यताप्राप्त खरेदी संस्थाच्या माध्यमातून केन्द्रीय नोडल एजन्सीद्वारे या राज्ये तसेच केंद्र शासित प्रदेशांना मूल्य समर्थन योजना (पीएसएस) अंतर्गत डाळी, तिलबिया आणि नारळ पिकाच्या खरेदीबाबत प्रस्ताव आल्यास मंजूरी दिली जाईल, यामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांकरता वर्ष 2020-21 साठी अधिसूचित केलेल्या हमीभावाने सरळ या पीकांसाठी एफएक्यू श्रेणीची खरेदी केली जाऊ शकेल. 

 

खरीप 2020-21 आणि रब्बी 2021 अंतर्गत 18.04.2021 पर्यंत सरकार द्वारे आपल्या नोडल एजन्सीच्या माध्यमातून 5,74,125.54 मेट्रिक टन मूग, उडीद, तूर, चना, मसूर, भुईमूग, राईच्या बीया आणि सोयाबीनची खरेदी एमएसपी मूल्यावर करण्यात आली आहे. या खरेदीमुळे तमिळनाडु, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा आणि राजस्थानच्या 3,65,065 शेतकऱ्यांना 3,016.53 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. 

 

याचप्रकारे, 5,089 मेट्रिक टन खोबऱ्याची (बारमाही पीक) खरेदी कर्नाटक आणि तमिळनाडु राज्यातून केली आहे.याच दरम्यान 3,961 शेतकऱ्यांना लाभान्वित करत 18 एप्रिल, 2021 पर्यंत किमान समर्थन मूल्यापोटी 52 कोटी 40 लाख रुपये देण्यात आले आहेत. या संबंधित राज्ये और केंद्र शासित प्रदेशांची सरकारे खरीप डाळी तसेच तेलबीया पिकांच्या आवकच्या आधारावर संबंधित राज्यांद्वारे ठरलेल्या तारखेपासून खरेदी सुरु करण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जात आहे . 

   

किमान समर्थन मूल्य योजने अंतर्गत पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, ओदिशा आणि कर्नाटक राज्यातून कापसाची खरेदीही सुरळीत चालू आहे. दिनांक 18.04.2021 पर्यंत 18,86,498 शेतकऱ्यांकडून 26,719.51 कोटी रुपयांच्या एमएसपी मूल्यावर कापसाच्या 91,89,311 गाठींची खरेदी झाली आहे. 

 

***

Jaydevi PS/VG/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712819) Visitor Counter : 124


Read this release in: English , Punjabi , Hindi