मंत्रिमंडळ

अवकाशाचा शांततामय कामांसाठी वापर करण्यात सहकार्य करण्याबद्दल भारत आणि बाहरीन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 31 JUL 2019 4:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जुलै 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि बाहरीन यांच्यात अवकाशातील जागेचा शांततामय कामांसाठी वापर करण्याविषयी झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. भारताने बंगळूरु येथे बाहरीन सरकारने मनामा येथे मार्च 2019 मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

सविस्तर माहिती:-

या करारामुळे अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान तसेच पृथ्वीशी दूरवरुन टेहळणी, संवाद उपग्रह, उपग्रहांच्या मदतीने दिशा दर्शन अशा विविध विषयांवर परस्पर सहकार्य घेणे शक्य होणार आहे.

या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशातल्या अवकाश संशोधन संस्थेच्या सदस्यांचा एक संयुक्त कृती गट स्थापन केला जाईल. हा कृती गट करारातील तरतुदींच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करेल.

अंमलबजावणी धोरण आणि उदिृष्ट:-

या सामंजस्य करारामुळे संयुक्त कृती गट स्थापन करणे शक्य होईल. हा कृती गट आराखडा तयार करेल.

लाभ:-

या करारामुळे दोन्ही देशातील अवकाश क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल ज्याचा लाभ समाजातल्या सर्व घटकांना आणि मानवतेला होऊ शकेल.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 



(Release ID: 1580882) Visitor Counter : 65


Read this release in: English