पंतप्रधान कार्यालय

तामिळनाडुच्या चक्रीवादळात प्राण गमावलेल्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

Posted On: 16 NOV 2018 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडुतील चक्रीवादळामुळे झालेल्या  जीवितहानीबद्दल  शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, चक्रीवादळात  मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांचे दुःख मी समजू शकतो. या वादळामुळे जखमी झालेल्यांनी लवकर बरे व्हावे यासाठी  मी प्रार्थना करतो.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर  मदतीसाठी सर्व यंत्रणा राबत असून, शक्य ते सर्व  सहकार्य  पुरविण्यासाठी अधिकारी कार्यरत आहेत.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, तामिळनाडुचे मुख्यमंत्री थिरु एडूप्पादी के. पलानीस्वामी यांच्याशी राज्याच्या वादळामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीबद्दल माझे बोलणे झाले असून, केंद्र सरकारतर्फे, सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन मी दिले आहे.

मी तमिळनाडुच्या जनतेच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1553143) Visitor Counter : 63


Read this release in: English