कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
कौशल्य भारत अभियानाचे राजदूत म्हणून वरुण धवन आणि अनुष्का शर्मा करारबद्ध
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2018 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2018
हिंदी चित्रपट अभिनेते वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांची कौशल्य भारत अभियानाचे राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोघांनी “सुई धागा -मेड इन इंडिया” या चित्रपटाद्वारे देशातील छोट्या कारागिरांचे कौशल्य आणि त्यांना भेडसावणारी आव्हानं यांचे दर्शन घडवले आहे. हे दोघे जण देशाच्या कुशल गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आपला अमूल्य वेळ व्यतीत करतील. या दोघांची कौशल्य भारत अभियानाची राजदूत म्हणून निवड झाल्यानंतर युवकांना कौशल्य प्रशिक्षण घेऊन उदरर्निवाहाचे उत्तम साधन निवडण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
N.Sapre/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1546724)
आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English