गृह मंत्रालय
केरळमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरूच
अन्न आणि औषधांची तरतूद करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे राष्ट्रीय आपत्ती, व्यवस्थापन समितीचे केंद्रीय मंत्रालयांना निर्देश
Posted On:
19 AUG 2018 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2018
केरळमध्ये पूर ओसरायला सुरूवात झाल्यानं अन्न, पाणी, औषधांचा पुरवठा याबरोबरच वीज, पेट्रोल, डिझेल, दूरसंवाद आणि वाहतूक यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी तरतूद करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश कॅबिनेट सचिव पी. के. सन्हिा यांनी दिले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, केंद्रीय मंत्रालये आणि केरळ सरकार यांच्यात मदत आणि बचाव कार्यात समन्वय राखण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची चार दिवसातली ही चौथी बैठक आहे.
केरळमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू असून नौदल, हवाई दल, लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे हजारो जवान मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. डझनभर हेलिकॉप्टर आणि मानवे तसेच सुमारे शंभर मोटारबोटच्या सहाय्याने हे कार्य सुरू आहे. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.
पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 38,000 हून जास्त जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. 23,000 पेक्षा जास्त लोकांना औषधे पुरविण्यात आली तर अन्न प्रक्रिया मंत्रालयाने 3 लाख अन्नाची पाकिटे पूरग्रस्तांना पुरवली आहेत.
N.Sapre/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1543384)
Visitor Counter : 82